शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

ठेंगोडा परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ

ठेंगोडा : परिसरात भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिसरात वर्षभरातील चोरीच्या घटनांची आकडेवारी बघितल्यास हा आकडा डझनाच्या वर जाईल मात्र अशा प्रकारे होतं असलेल्या चोऱ्यांच्या घटनांनंतर पोलीस यंत्रणेकडून छेडा लावला जात नसल्यामुळे पोलीस पंचनामा करून केवळ कारवाईचा फार्स करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.चोरीच्या घटना घडल्या म्हणजे पोलीस येऊन पंचनाम्याचा फार्स पूर्ण करतात; मात्र घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे चोरांचे फावते. घरातील सर्व सदस्य बाहेर गावी गेल्यावरच कुलूप तोडून चोरी झाल्याचे आजपर्यंतच्या सर्व चोरी प्रकरणात घडले आहे. आजपर्यंत बाजारपेठेतील आनंदा शेठ यांच्या घरात, शहा बंधू यांच्या घरात, शॉपिंग सेंटरमधील बापू शेवाळे यांच्या इलेक्ट्रिक दुकानात आदि ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. ठेंगोड्यात लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र होणे नित्याचा भाग झाला आहे. दीपावलीच्या दिवशी येथील प्रवीण रहाणे हे कुटुंबासह बाहेर गावी गेले असताना रात्री चोरांनी लोखंडी कपाट उघडून सोन्याची अंगठी व रोख रक्कम चोरून नेली. पोलिसांनी नेहमीप्रमाणे पंचनामा केला असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलीस यंत्रणेने ठेंगोड्यात जरब बसवून कायदा सुव्यवस्थेचे वातावरण तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)नगर हत्त्याकांडाचा निषेधमालेगाव : नगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाचा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेतर्फे येथील महसूल प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे धर्मा म्हसदे, कुणाल शिंपी, रहेमत पठाण, डॉ. मनोहर जगताप आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)