शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

सीबीएस परिसरात वाढले किरकोळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST

उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्याने बंद केली ...

उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव

नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्याने बंद केली जातात. मात्र, परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर उद्यानांची दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे उद्यानांचे काम हाती घेण्यात आले नसल्याने वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी

नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु,प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. सध्या नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाहीत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सारडा सर्कल परिसराला

पुन्हा वाहनांचा गराडा

नाशिक :गडकरी चौक ते सारडा सर्कल परिसरात रस्त्यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. बरेचदा वादावादीचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील या अनधिकृत वाहनतळांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

नाशिक : कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, आता पंचवटीसह शहर परिसर पूर्वपदावर आले असल्याने विविध भागांत भाजीपाला, उसाचे चिपाड, फेकलेले पदार्थ असे खाद्य मिळू लागल्याने पुन्हा शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढल्याने वाहनचालकांना या मोकाट जनावरांचा अडथळा होऊ लागला आहे.

सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक: मुंबई नाका ते आडगाव नाका या भागातील दोन्ही बाजूच्या सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येते. त्यात वाहन आदळून किंवा खड्डा चुकवताना अन्य वाहनाला धडकल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी सातत्याने होत असूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे .

द्वारकाच्या सिग्नलवर कोंडी

नाशिक :द्वारका चौकात पुन्हा सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील भुयारी मार्गातून पादचाऱ्यांना जाणे बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. पादचारी, दुचाकी, रिक्षा अशा वाहनचालकांची कोंडी होऊन दुचाकीचालकांमुळे चारचाकी वाहनधारकांचीदेखील तारांबळ उडते. चौकात वाहतूक पोलीस उभे असूनही पादचारी भुयारी मार्गाचा उपयोग करताना दिसत नाहीत.