शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

मालेगावात फुलांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST

----- सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. ...

-----

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. कडीकोंडा नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----

क्रीडा संकुलाजवळील रस्ता दुरुस्तीची मागणी

मालेगाव : शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली होती; मात्र महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊनही रस्ता दुरुस्त केला नाही. नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

-----

सायकल बाजारातील उलाढाल वाढली!

मालेगाव : सध्या हिवाळा सुरू असल्याने व्यायामासाठी नागरिक सायकलींगला पसंती देत आहेत. सायकलस्वारांचे ग्रुप तयार करून सकाळच्या सत्रात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सायकली दिसत आहेत. परिणामी, सायकल बाजारात सायकल विक्री वाढली आहे.

-----

सटाणानाका भागात पोलीस चौकीची मागणी

मालेगाव : शहरातील सटाणानाका भागात पोलीस चौकी कागदोपत्री कार्यरत आहे; मात्र पाेलीस चौकीत अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात बँका, खासगी कार्यालये, रुग्णालये, मोठमोठी आस्थापने आहेत. ही चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-----

वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्याची मागणी

मालेगाव : शहरात सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र या वृक्षांची कत्तल व नासधूस केली जात आहे. महापालिका वृक्ष चळवळीबाबत उदासीन आहे. सामाजिक संस्थांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली जात आहे.

-----

बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील काही भागांमध्ये पथदीप बंद पडले आहेत. नादुरुस्त पथदीपांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----

उद्यानाची साफसफाईची मागणी

मालेगाव : सोयगाव भागातील राजमाता जिजाऊ उद्यानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कारंजा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. या उद्यानातील खेळणीची साफसफाई करून उद्यानात साचलेले दूषित पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली जात आहे.