शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मालेगावात फुलांच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST

----- सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. ...

-----

सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. कडीकोंडा नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

----

क्रीडा संकुलाजवळील रस्ता दुरुस्तीची मागणी

मालेगाव : शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली होती; मात्र महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊनही रस्ता दुरुस्त केला नाही. नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.

-----

सायकल बाजारातील उलाढाल वाढली!

मालेगाव : सध्या हिवाळा सुरू असल्याने व्यायामासाठी नागरिक सायकलींगला पसंती देत आहेत. सायकलस्वारांचे ग्रुप तयार करून सकाळच्या सत्रात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सायकली दिसत आहेत. परिणामी, सायकल बाजारात सायकल विक्री वाढली आहे.

-----

सटाणानाका भागात पोलीस चौकीची मागणी

मालेगाव : शहरातील सटाणानाका भागात पोलीस चौकी कागदोपत्री कार्यरत आहे; मात्र पाेलीस चौकीत अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात बँका, खासगी कार्यालये, रुग्णालये, मोठमोठी आस्थापने आहेत. ही चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-----

वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्याची मागणी

मालेगाव : शहरात सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र या वृक्षांची कत्तल व नासधूस केली जात आहे. महापालिका वृक्ष चळवळीबाबत उदासीन आहे. सामाजिक संस्थांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली जात आहे.

-----

बंद पथदीप सुरू करण्याची मागणी

मालेगाव : शहरातील काही भागांमध्ये पथदीप बंद पडले आहेत. नादुरुस्त पथदीपांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----

उद्यानाची साफसफाईची मागणी

मालेगाव : सोयगाव भागातील राजमाता जिजाऊ उद्यानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कारंजा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. या उद्यानातील खेळणीची साफसफाई करून उद्यानात साचलेले दूषित पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली जात आहे.