शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाटणे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

उन्हाळी कांद्याचे भाव ७०००पर्यंत पोहोचले होते. चांगल्या भावामुळे बळीराजा काही दिवस थोडा सुखावला होता. पुढील पिकासाठी भांडवल ...

उन्हाळी कांद्याचे भाव ७०००पर्यंत पोहोचले होते. चांगल्या भावामुळे बळीराजा काही दिवस थोडा सुखावला होता. पुढील पिकासाठी भांडवल म्हणून याचा उपयोग होईल, या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याचे नियोजन केले. मात्र, केंद्राने निर्यातबंदी केल्याने दिवसेंदिवस भावात घसरण होत गेली आणि शेवटी भाव हजार-पंधराशे रुपयांवर येऊन ठेपला. कांद्याचे भाव कोसळल्याने सर्व नियोजन विस्कळीत झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दोन पैसे हाती येतील व रब्बी पिकाची लागवड होईल, या भोळ्या आशेवर असणारा बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा बळी ठरला आहे.

कांद्याचे रोप पावसामुळे आधीच खराब झाले. त्यातच बियाणांचा तुटवडा जाणवत होता. शेतकऱ्यांनी जवळजवळ चार हजार रुपये किलो दराने बियाणे खरेदी करून, रोपे तयार करण्यासाठी बियाणे टाकले. मात्र, सततच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक बुरशीनाशकांचा वापर करूनही करपा आणि मर रोग आटोक्यात येत नाही.

कांद्याचे रोप विविध रोगांना बळी पडत आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.काय करावं, कोणत्या औषधांची फवारणी करावी हेही कळेनासे झाले आहे. रोप खराब होत असल्याने अपेक्षित क्षेत्रात कांद्याची लागवड होणार नाही. उरलेल्या क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

एकूणच बदलत्या ढगाळ, रोगट वातावरणामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल की नाही, याची शाश्वती दिसत नाही. बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा मुकाबला कसा करावा, या समस्येने हैराण झाला आहे.