शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पाटणे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

उन्हाळी कांद्याचे भाव ७०००पर्यंत पोहोचले होते. चांगल्या भावामुळे बळीराजा काही दिवस थोडा सुखावला होता. पुढील पिकासाठी भांडवल ...

उन्हाळी कांद्याचे भाव ७०००पर्यंत पोहोचले होते. चांगल्या भावामुळे बळीराजा काही दिवस थोडा सुखावला होता. पुढील पिकासाठी भांडवल म्हणून याचा उपयोग होईल, या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याचे नियोजन केले. मात्र, केंद्राने निर्यातबंदी केल्याने दिवसेंदिवस भावात घसरण होत गेली आणि शेवटी भाव हजार-पंधराशे रुपयांवर येऊन ठेपला. कांद्याचे भाव कोसळल्याने सर्व नियोजन विस्कळीत झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दोन पैसे हाती येतील व रब्बी पिकाची लागवड होईल, या भोळ्या आशेवर असणारा बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा बळी ठरला आहे.

कांद्याचे रोप पावसामुळे आधीच खराब झाले. त्यातच बियाणांचा तुटवडा जाणवत होता. शेतकऱ्यांनी जवळजवळ चार हजार रुपये किलो दराने बियाणे खरेदी करून, रोपे तयार करण्यासाठी बियाणे टाकले. मात्र, सततच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक बुरशीनाशकांचा वापर करूनही करपा आणि मर रोग आटोक्यात येत नाही.

कांद्याचे रोप विविध रोगांना बळी पडत आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.काय करावं, कोणत्या औषधांची फवारणी करावी हेही कळेनासे झाले आहे. रोप खराब होत असल्याने अपेक्षित क्षेत्रात कांद्याची लागवड होणार नाही. उरलेल्या क्षेत्रात कोणते पीक घ्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

एकूणच बदलत्या ढगाळ, रोगट वातावरणामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल की नाही, याची शाश्वती दिसत नाही. बळीराजा मात्र सुलतानी आणि अस्मानी संकटाचा मुकाबला कसा करावा, या समस्येने हैराण झाला आहे.