शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

वातावरण बदलामुळे आजाराचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:50 IST

वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

नाशिक : वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडी जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.  वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्यामुळे औषध फवारणी, स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देऊन आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये, दिवसा उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा, डोक्यावर टोपी परिधान करावी, संध्याकाळीदेखील बाहेर फिरताना काळजी घ्यावी, दुचाकीवरून प्रवास करताना नाका-तोंडाला रुमाल लावावा व कानात कापसाचे बोळे ठेवावे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.बालकांच्या आरोग्य जपाबदलत्या हवामान व ऋतुमानामुळे नागरिकांनी बालकांचे आरोग्यही जपण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर बदलत्या हवामानाचा लवकर परिणाम होत असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जर कोणाला सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर त्या व्यक्तीपासून बालकांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.