शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दारणा, भावली धरणाच्या पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

वाडीवऱ्हे वीज वितरण केंद्रावर वीज कोसळल्यामुळे अनेक गावे अंधारात नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर सुरूच ...

वाडीवऱ्हे वीज वितरण केंद्रावर वीज कोसळल्यामुळे अनेक गावे अंधारात

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर सुरूच आहे. तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा तसेच भावली या दोन धरणांमधील पाण्याच्या पातळीने अचानक उसळी घेतली. सकाळी दारणा ७४.२० टक्के तर भावली धरण ८६.४४ टक्के भरले आहे. ही दोन्हीही धरणे ओव्हरफ्लोच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा अंदाज बघून जलाशयातून विद्युतग्रहाद्वारे सुमारे ६७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण व धरणातील पाण्याची उपलब्धता बघूनच दारणा धरणातून अतिरिक्त किती व कधी पाणी सोडायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी शक्यता आहे. दारणा धरणात ७ हजार १४९ पैकी ५ हजार २४० दलघफु इतका उपयुक्त पाण्याचा साठा तयार आहे. तर भावली धरणाची ओव्हरफ्लो च्या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. दारणा देखील कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभ क्षेत्रातील गावांना आतापासूनच सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा दिला आहे.

------------------------

नऊ गावे २४ तासांपासून अंधारात

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावे जवळपास कालपर्यंत अंधारात होती. पूर्व भागातच नव्हे तर तालुक्यात इतर बऱ्याच ठिकाणी बत्ती गुल झालेली होती. सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात खंडित वीजपुरवठ्याची समस्या बघायला मिळते. बुधवारी सायंकाळी सर्वत्र वीज चमकत होती. त्यातील एक वीज वाडीव-हे येथील वीज वितरण उपकेंद्रातील वीजप्रणालीवर कोसळली. त्यात बरीच जाळपोळ झाल्याने कर्मचाऱ्यांची सर्वत्र एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे उपकेंद्राच्या अंतर्गत गोंदे दुमाला, मुकणे, पाडळी देशमुख, जानोरी, अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक आदी गावांचा तसेच गोंदे औद्योगिक वसाहतीचा वीजपुवठा खंडित झाला होता. याबाबत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपकेंद्राचे उपअभियंता धवल आगरकर आणि त्यांची संपूर्ण टीम पहाटेपासून कार्यरत होती. वीजपुरवठा तत्काळ सुरु व्हावा यासाठी वीज वितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

--------------------

वीज ग्राहकांनी शेतीपंप तसेच घरगुती बिले भरून वीज वितरणला सहकार्य केल्यास अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या वीजतारा, रोहित्र तसेच इतर कामे करण्यास हातभार लागेल. यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य मिळेल.

- धवल कुलकर्णी, उप अभियंता, वाडिव-हे वीज केंद्र

---------------------

दारणा धरणातून ६७० क्युसेकने होत असलेला विसर्ग. २) वाडिव-हे वीज केंद्रावर वीज पडल्यामुळे वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना. (२३ दारणा, २३ नांदूरवैद्य)