शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

धरणाच्या पाणी क्षमतेत वाढ

By admin | Updated: June 20, 2015 01:33 IST

वळण प्रकल्पांची पाहणी

  नाशिक : घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी धरणांमध्ये वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी वळण योजना प्रकल्पामुळे भविष्यात सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील धरणे पूर्ण क्षमतेने भरणार असून, या प्रकल्पामुळे येथील तालुक्यातील शेतकऱ्यांनाही बारमाही पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. सुरगाणा व दिंडोरी तालुक्यांतील वळण योजना प्रकल्पांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आमदार जिवा पांडू गावित, मेरीचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार, अधीक्षक अभियंता ए. बी. कोकटे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, कार्यकारी अभियंता गिरीश संघाने, तहसीलदार यू. के. मोरे, एम. जी. कनोजे आदि उपस्थित होते. यावेळी बागडे म्हणाले की, वळण योजना प्रकल्पामुळे जिल्'ाचे नंदनवन होणार आहे. शेतीला बारमाही पाण्याची गरज असून, स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बागडे यांनी झार्लीपाडा, गोळशी महाजे, हट्टीपाडा, मांजरपाडा वळण योजनेच्या कामांची पाहणी करून उर्वरित कामे लवकर होण्याच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या वळण योजना प्रकल्पांच्या माध्यमातून किती पाणी वळविले जाईल व किती साठविले जाईल याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. स्थानिक लोकांशी चर्चा करताना त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.