शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पोलीस पाटलांचे मानधन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:08 IST

मालेगाव : राज्यात कार्यरत असलेल्या ३० हजार पोलीस पाटलांना शासनाने १५ हजार रुपये मानधन द्यावे, पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ६५ करावे, सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्टÑ राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मालेगाव : राज्यात कार्यरत असलेल्या ३० हजार पोलीस पाटलांना शासनाने १५ हजार रुपये मानधन द्यावे, पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ६५ करावे, सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्टÑ राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील पुढे म्हणाले की, २०१४ साली पोलीस पाटलांचे राज्यस्तरीय संमेलन झाले. या संमेलनात पोलीस पाटलांना साडेसात हजार रुपये मानधन दिले जाईल अशी घोषणा तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती. मात्र राज्यातील सत्तांतरामुळे पोलीस पाटलांच्या मानधनातील वाढ रखडली होती. गेल्या २६ नोव्हेंबर रोजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र समितीने केवळ दीड हजार रुपयांची मानधन वाढ सुचवली आहे. ही वाढ अन्यायकारक आहे. सध्या ३ हजार रुपये तुटपुंजे मानधन मिळत आहे. पोलीस पाटलांना १५ हजार रुपये मानधन वाढ द्यावी. सेवानिवृत्ती वेतन लागू करावे, गाव पातळीवर कार्यालय सुरू करावे अन्यथा शासनाच्या विरोधात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्याचा निर्धार महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बच्छाव, तालुकाध्यक्ष अरुण जगताप, जिल्हा संघटक रविंद्र खैरनार, शरद अहिरे, स्वप्नील शेलार आदि उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकार