शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तलावाची साठवण क्षमता वाढवा

By admin | Updated: September 29, 2015 23:30 IST

३८ गाव पाणी योजना : भुजबळ यांच्या बैठकीत सूचना

येवला : येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारात ५५ गावाचा समावेश होणार यासाठी साठवण तलावाची क्षमता वाढावी, नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण २१ गावांना शाश्वत पाणी मिळावे. या योजनेचा समावेश पंचायत समिती कृती आराखड्यात करावा याबाबत नाशिक येथे बैठक संपन्न झाली. येवला तालुक्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७ नोव्हेंबर २००९ रोजी तत्कालीन जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार छगन भुजबळ यांचे हस्ते ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून त्या अंतर्गत येवला तालुक्यातील टँकर ग्रस्त २३ गावे व उर्विरत १५ गावे असे एकूण ३८ गावांना पाणीपुरवठा सुरु केला गेला. सन २०१६ मधील १ लाख ९ हजार ६०० लोकसंख्या व सन २०३१ मधील १ लाख ४२ हजार ६०० लोकसंख्या असा अंतरिम टप्पा मानून दरडोई ५५ लिटर पाणी दिले जाते. दरम्यान ३८ गाव पाणीपुरवठा समिती स्थापन होऊन हि योजना १ एप्रिल २०१२ पासून आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समिती अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, व सहकारी ही योजना सक्षम पणे राबवित आहे. यंदा कमी पर्जन्यमान असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मूळ ३८ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत टंचाई ची सात गावे समाविष्ठ झाली. अशा ४५ गावांना पाच दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले गेले. नियमित पाणीपट्टीदेखील वसूल करण्यात येते. याशिवाय चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, सातारे, कोळम बु., मुरमी, बाळापुर, वाईबोथी, कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक, बोकटे, देवळाणे, अनकाई, घुलेगाव, अंगुलगाव, तांदुळवाडी, गुजरखेडे, खैरगव्हाण अशा एकूण १७ गावांनी ठरावाद्वारे मागणी करून या योजनेत आम्हाला समाविष्ट करून घ्यावे असा आग्रह धरला आहे. तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, रहाडी, पिंपळखुटे, पन्हाळ साठे, वाघाळे, सोमठाण जोश, आहेरवाडी, कोळम, पांजरवाडी, हडप सावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडे, धामणगाव, या अवर्षणप्रवण क्षेत्रातील २० गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही. व या गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून योजना प्रस्तावित करावी अशा सूचना आमदार छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, कळमकर, मोहन शेलार, प्रकाश वाघ, महेश पैठणकर, डी.जी. सपकाळे, उत्तम घुले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)