शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अकाली मृत्यूत वाढ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST

नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते ...

नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते व वृद्धांचाही समावेश असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. असे असले तरी, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अशा कुटुंबीयांनाही भविष्याची चिंता लागून असल्याने अनेकांनी याकाळात मृत्यूपत्र करून घेतल्याचे समोर आले आहे.

मृत्यूपत्र करणाऱ्यांमध्ये विशेषकरून वृद्धत्वाकडे झुकलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आपल्या जाण्याने कुटुंबीयांचे, मुला-बाळांचे कसे होईल, या एकमेव चिंतेबरोबरच वडिलोपार्जित संपत्ती मातीमोल ठरू नये, या भावेनेतूनदेखील मृत्यूपत्र केले जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मृत्यूपत्र नोटरी व दुय्यम निबंधकांकडे नोंदणी पद्धतीने केले जाते. मात्र, त्यासाठी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तींची समक्ष उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

-----------

स्वकष्टीत मालमत्तेचेच होईल मृत्यूपत्र

मृत्यूपत्र तयार करतांना स्वकष्टाची वा वडिलांकडून स्वत:ला मिळालेल्या मालमत्तेचेच मृत्यूपत्र तयार करता येते. एकापेक्षा जास्त व्यक्तींचे हक्क असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र कायद्याने अडचणीचे ठरते.

-----------

मृत्यूपत्राविषयी गोपनीयता महत्त्वाची

आमच्या आजोबांची स्वत:च्या मालकीची मिळकत होती. कोरोना काळात त्यांना कुटुंबाची चिंता भेडसावू लागल्याने त्यांनी स्वमर्जीने मृत्यूपत्रात मालमत्तेची नोंद करून वाटप करून ठेवले आहे.

- गणेश देशमुख

-----------

मृत्यूपत्राला देता येते आव्हान

मृत्यूपत्र स्वखुषीने तयार करण्यात आले व त्यासाठी साक्षीदार, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आली असली तरी, मृत्यूपत्रातील मालमत्तेबाबतची संबंधित व्यक्ती मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

---------------

संख्या वाढली, पण निश्चित आकडेवारी नाही

गेल्या वर्षभराच्या काळात मृत्यूपत्र तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु मृत्यूपत्र नोटरी पद्धतीने व दुय्यम निबंधकांकडे नोंदविले जात असल्याने त्याची निश्चित अशी आकडेवारी संकलित करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु एरव्ही होणाऱ्या मृत्यूपत्रापेक्षा या काळात संख्या वाढली आहे.

---------

मृत्यूपत्र हे स्वखुषीने करून देणारा दस्तऐवज आहे. त्यामुळे त्याला कायदेशीर प्रक्रियेत बसवून तयार करणे गरजेचे आहे. मात्र, मृत्यूपत्राविषयी व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाद होऊ शकतात. त्यामुळे मृत्यूपत्र तयार करताना संबंधित व्यक्तीच्या दस्तऐवजात वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे.

- अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे-पाटील

------

मृत्यूपत्र नोटरी केले तरी चालते. साधारणत: वाढते वयोमान, भविष्यातील संगोपनाची चिंता व वडिलोपार्जित मालमत्तेचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी प्रामुख्याने मृत्यूपत्र केले जाते. त्याला कायदेशीर जोड देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

-अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे, नोटरी