शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कोरोनामुळे अकाली मृत्यूत वाढ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST

नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते ...

नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते व वृद्धांचाही समावेश असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. असे असले तरी, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अशा कुटुंबीयांनाही भविष्याची चिंता लागून असल्याने अनेकांनी याकाळात मृत्यूपत्र करून घेतल्याचे समोर आले आहे.

मृत्यूपत्र करणाऱ्यांमध्ये विशेषकरून वृद्धत्वाकडे झुकलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आपल्या जाण्याने कुटुंबीयांचे, मुला-बाळांचे कसे होईल, या एकमेव चिंतेबरोबरच वडिलोपार्जित संपत्ती मातीमोल ठरू नये, या भावेनेतूनदेखील मृत्यूपत्र केले जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मृत्यूपत्र नोटरी व दुय्यम निबंधकांकडे नोंदणी पद्धतीने केले जाते. मात्र, त्यासाठी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तींची समक्ष उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

-----------

स्वकष्टीत मालमत्तेचेच होईल मृत्यूपत्र

मृत्यूपत्र तयार करतांना स्वकष्टाची वा वडिलांकडून स्वत:ला मिळालेल्या मालमत्तेचेच मृत्यूपत्र तयार करता येते. एकापेक्षा जास्त व्यक्तींचे हक्क असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र कायद्याने अडचणीचे ठरते.

-----------

मृत्यूपत्राविषयी गोपनीयता महत्त्वाची

आमच्या आजोबांची स्वत:च्या मालकीची मिळकत होती. कोरोना काळात त्यांना कुटुंबाची चिंता भेडसावू लागल्याने त्यांनी स्वमर्जीने मृत्यूपत्रात मालमत्तेची नोंद करून वाटप करून ठेवले आहे.

- गणेश देशमुख

-----------

मृत्यूपत्राला देता येते आव्हान

मृत्यूपत्र स्वखुषीने तयार करण्यात आले व त्यासाठी साक्षीदार, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आली असली तरी, मृत्यूपत्रातील मालमत्तेबाबतची संबंधित व्यक्ती मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

---------------

संख्या वाढली, पण निश्चित आकडेवारी नाही

गेल्या वर्षभराच्या काळात मृत्यूपत्र तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु मृत्यूपत्र नोटरी पद्धतीने व दुय्यम निबंधकांकडे नोंदविले जात असल्याने त्याची निश्चित अशी आकडेवारी संकलित करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु एरव्ही होणाऱ्या मृत्यूपत्रापेक्षा या काळात संख्या वाढली आहे.

---------

मृत्यूपत्र हे स्वखुषीने करून देणारा दस्तऐवज आहे. त्यामुळे त्याला कायदेशीर प्रक्रियेत बसवून तयार करणे गरजेचे आहे. मात्र, मृत्यूपत्राविषयी व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाद होऊ शकतात. त्यामुळे मृत्यूपत्र तयार करताना संबंधित व्यक्तीच्या दस्तऐवजात वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे.

- अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे-पाटील

------

मृत्यूपत्र नोटरी केले तरी चालते. साधारणत: वाढते वयोमान, भविष्यातील संगोपनाची चिंता व वडिलोपार्जित मालमत्तेचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी प्रामुख्याने मृत्यूपत्र केले जाते. त्याला कायदेशीर जोड देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

-अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे, नोटरी