शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

घरातील तरुणांमुळेच ज्येष्ठांसह बालकांच्या बाधित प्रमाणात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना किंवा संसर्ग झाल्याचे प्रकार अल्प आणि कोरोनाला बळी पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, गत लाटेच्या अनुभवातून बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाचा विचार करुन आता घरांमध्येच थांबणे पसंत केले आहे. तरीदेखील दुसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना आणि ज्येष्ठांना संसर्गाची लक्षणे आढळण्याच्या प्रमाणात मोठीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कामधंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या २५ ते ५० वयोगटातील कमावत्या तरुण व्यक्तींमुळेच हा संसर्ग वाढत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गतवर्षी डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ वर्षाखालील लहान मुलांना ताप, घसादुखी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळली असली, तरी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक बालकांना कोरोना झाला तरी त्यातील बहुतांश बालकांना ॲडमिट करावे लागले नव्हते. त्यामुळे ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, केवळ त्या घरांमधील बालकांमध्येच प्रामुख्याने आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते. त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांचा मोठा समावेश होता. त्याशिवाय मुलांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळण्याचा पॅटर्न दिसून आला होता. अनेक बालकांमध्ये बारीकसा ताप, थोडेसे गरगरणे, खोकला व घसादुखी अशी सौम्य लक्षणे होती. नव्या कोरोना व्हायरस संबंधात जे संशोधन नव्याने पुढे आले त्यात असे आढळले की तरुणांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी असले तरी याआधीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असू शकते. गतवर्षी मोठ्या अर्थात १५ वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधितांची संख्या १६,६१२ इतकी होती. त्यात गत तीन महिन्यात तब्बल १० हजारांहून अधिक भर पडली असल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

६० वर्षांवरील बाधितांचे प्रमाण ४० टक्क्यांवर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये एकूण बाधित संख्येपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक वयोगटातील आहेत. त्यातील अनेक रुग्ण हे स्वत: कोणत्याही कामासाठी किंवा खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नव्हते. तरीदेखील त्यांना कोरोना झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना बाधा होण्यामागे घरातून उदरनिर्वाहासाठी बाहेर पडणाऱ्यांना झालेली बाधा हेच कारण असल्याचे बहुतांश प्रकरणांमध्ये दिसून येत आहे.

इन्फो

बाहेरुन घरी आल्यानंतर पूर्ण स्वच्छता

बहुतांश नागरिकांना पोटपाण्याच्या कामधंद्यासाठी घराबाहेर जावेच लागत आहे. अशा परिस्थितीत घरी आल्यानंतर किमान हे पूर्ण वर्षभर नागरिकांनी आल्यावर स्वत:चे सर्व कपडे धुवायला टाकून, बादलीभर पाण्याने स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडील मोबाइल, किचेन यासारख्या वस्तूदेखील सॅनिटाईज करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्यांनी कुटुंबासमवेत एका खोलीत झोपणेदेखील टाळण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

----------------