शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

देशहितासाठी राष्ट्रप्रेम वृद्धिंगत व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:54 IST

स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.

विवेक घळसासी : वसंत गौरव पुरस्कार वितरण समारंभ उत्साहातसटाणा : स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले त्यांचा विसर आजच्या पिढीला पडू लागला ही देशासाठी मोठी शोकांतिका आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रभक्तीचे प्रेम आटायला नको तर त ेवृद्धिंगत व्हावे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. येथील सहकारमहर्षी वसंतराव दगाजी पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध संस्थांना व गुणवंत विद्यार्थ्यांना वसंत गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा वसंत गौरव पुरस्कार शहरातील काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्राला जाहीर करण्यात आला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते केंद्राचे संचालक डॉ. सतीश लुंकड यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. त्याप्रसंगी आयोजित व्याख्यानमालेत शहीद भगतसिंग या विषयावर घळसासी बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्या रक्तातच राष्ट्रभक्ती, क्रांती आहे. त्यांचे आजोबा क्रांती तत्त्वाचे प्रणेते होते. त्यांनी भगतसिंगांसह दोन्ही नातवांना स्वातंत्र्य लढ्यात उतरविले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी बलिदान देणाºया अशा क्रांतिकारकांचा देशातील आजच्या पिढीला विसर पडत आहे. ही समाजासाठी धोक्याची घंटा असल्याचेही परखड मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मविप्र संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, हितेंद्र अहेर, प्रल्हाद पाटील, उपनगराध्यक्ष पुष्पा सूर्यवंशी, साहित्यायनचे अध्यक्ष प्रा. शं.क. कापडणीस, कल्याणराव भोसले, श्यामकांत मराठे, समीर पाटील, नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, द्वारकाबाई पाटील, डॉ.विजया पाटील, योगेश पाटील ,अभिजित पाटील, मनीषा पाटील, लालचंद सोनवणे, विजय वाघ, राजेन्द्र भांगडिया, देवेंद्र जाधव, घनश्याम कापडणीस, वसंत महाले आदी उपस्थित होते.