शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीचे पंचनामे करून अनुदान वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:29 IST

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देकांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात

कळवण : शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे साकडेकळवण : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता कोंब फुटून सडू लागल्याने जिल्ह्यातील कांदा चाळींच्या सद्यस्थितीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची मुदत व अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी सूचना शासनाला करावी, याकरिता राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घालण्यात आले आहे.माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, प्रशांत गायकवाड यांनी, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी कांदाप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी स्थितीत शेतकºयांनी कांद्याचे उत्पादन घेतले. प्रसंगी टँकरच्या पाण्यावर पीक जगवले. मात्र कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यादरम्यान दिवाळी व इतर सण, उत्सव असल्याने अनेक बाजार समित्या काही दिवस बंद होत्या. शेतकºयांनीही कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. कांद्याचा एकरी उत्पादन खर्च ४० हजार रुपयांपर्यंत येतो. सध्या बाजारात कांद्याला मिळणारे दर पाहता शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी तो चाळींमध्ये साठवून ठेवला आहे.हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला आहे. त्यामुळे योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले व चाळीत कांदा साठवून ठेवलेले शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात. कांद्याला अनुदान जाहीर केल्यानंतर कांद्याचे दर आणखी गडगडले आहेत. त्यामुळे सरकारने फेब्रुवारी २०१९पर्यंत विक्री केल्या जाणाºया कांद्याला किमान पाच रु पये प्रतिकिलो अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळी कांदा संपेपर्यंत अनुदान द्या; सरकारकडून तुटपुंजे अनुदान जाहीर झाल्याने संताप कळवण तालुक्यातील गेल्या वर्षी पिकवलेला उन्हाळी (गावठी) कांदा शेतकºयांकडील संपत नाही तोपर्यंत शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे यांच्याकडे लवकरच शेतकºयांचीकैफियत मांडण्यात येणार असल्याचे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना तुटपुंजे असे २ रु पये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानातून शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही. कांदाविक्री केल्याचा कालावधी अतिशय कमी आहे.