शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:30 IST

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली ...

ठळक मुद्देअपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.

सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे. नागरिकांच्या मदतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी भविष्याचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.१ कोटी २७ लाख रु पये खर्च करून तीन गावांची संयुक्त राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. अनेक दिवसांपासून करंजगाव येथून नवीन पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, गावात मुख्य पाईपलाईन फिरवणे अशी कामे चालू होती. मात्र कामांच्या इंस्टीमेन्टमध्ये पाण्याच्या टाकीला संरक्षण जाळी बसवणे, केबल, मोटार बदलणे, ठिकठिकाणी व्हॉल बसवणे , टाकीच्या जिन्याला रिलिंग करणे हे कामे अपूर्ण असल्याने योजना ग्रामपंचायतींने ताब्यात घेतली नाही. कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल व ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी पंचायत समीतीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरी देखील काम पूर्णत्वाची शहानिशा न करता ठेकेदाराने पैसे काढून घेतले. त्यामुळे अपूर्ण योजना ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना न विचारता पैसे दिल्याने आठ दिवसापासून केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांच्या पत्राला या निमित्त केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल, ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरीदेखील काम पूर्णत्वाची कोणतीही शहानिशा न करता समितीस्तरावर ठेकेदार यांनी पैसे काढून घेतले. आठ दिवसांपासून केबल जळाली आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा बंद आहे.- शरद खालकर, ग्रामपंचायत सदस्य