शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:30 IST

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली ...

ठळक मुद्देअपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद

अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.

सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे. नागरिकांच्या मदतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी भविष्याचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.१ कोटी २७ लाख रु पये खर्च करून तीन गावांची संयुक्त राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. अनेक दिवसांपासून करंजगाव येथून नवीन पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, गावात मुख्य पाईपलाईन फिरवणे अशी कामे चालू होती. मात्र कामांच्या इंस्टीमेन्टमध्ये पाण्याच्या टाकीला संरक्षण जाळी बसवणे, केबल, मोटार बदलणे, ठिकठिकाणी व्हॉल बसवणे , टाकीच्या जिन्याला रिलिंग करणे हे कामे अपूर्ण असल्याने योजना ग्रामपंचायतींने ताब्यात घेतली नाही. कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल व ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी पंचायत समीतीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरी देखील काम पूर्णत्वाची शहानिशा न करता ठेकेदाराने पैसे काढून घेतले. त्यामुळे अपूर्ण योजना ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना न विचारता पैसे दिल्याने आठ दिवसापासून केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांच्या पत्राला या निमित्त केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल, ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरीदेखील काम पूर्णत्वाची कोणतीही शहानिशा न करता समितीस्तरावर ठेकेदार यांनी पैसे काढून घेतले. आठ दिवसांपासून केबल जळाली आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा बंद आहे.- शरद खालकर, ग्रामपंचायत सदस्य