शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे ...

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीसही उपस्थित राहात नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रेल्वे सेवेला शेतकऱ्यांची पसंती

नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानाने दोन तासांत दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये जात असले तरी या सेवेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विमानाचे आणि रेल्वेचे भाडे यात मोठी तफावत असल्याने शेतकरी रेल्वेने माल पाठविण्यास अधिक पसंती देतात.

थेट विक्रीमुळे तरुणांना रोजगार

नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या गावांमधील अनेक शेतकरी तरुणांनी शहरात थेट ग्राहकांना माल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगला भाजीपाला व इतर शेतीमाल मिळू लागल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.

लग्नसराईमुळे बाजारपेठेत चैतन्य

नाशिक : लग्नसराईमुळे शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे. मागील आठ ते नऊ महिने लग्नसोहळ्यांना पूरकव्यवसायांवर गडांतर आले होते. त्यामुळे विवाह सोहळ्यांनिमित्ताने होणारी मोठी आर्थिक उलाढाल मंदावली होती.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

नाशिक : ग्रामीण भागात थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. भाजीपाला आणि टॉमेटो पिकावर थंडीचा अधिक परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी गव्हावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

गांधीनगरमधील पथदीप बंद

नाशिक : गांधीनगर परिसरातील अनेक पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणे धोकादायक ठरू लागले आहे.