शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे ...

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीसही उपस्थित राहात नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रेल्वे सेवेला शेतकऱ्यांची पसंती

नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानाने दोन तासांत दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये जात असले तरी या सेवेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विमानाचे आणि रेल्वेचे भाडे यात मोठी तफावत असल्याने शेतकरी रेल्वेने माल पाठविण्यास अधिक पसंती देतात.

थेट विक्रीमुळे तरुणांना रोजगार

नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या गावांमधील अनेक शेतकरी तरुणांनी शहरात थेट ग्राहकांना माल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगला भाजीपाला व इतर शेतीमाल मिळू लागल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.

लग्नसराईमुळे बाजारपेठेत चैतन्य

नाशिक : लग्नसराईमुळे शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे. मागील आठ ते नऊ महिने लग्नसोहळ्यांना पूरकव्यवसायांवर गडांतर आले होते. त्यामुळे विवाह सोहळ्यांनिमित्ताने होणारी मोठी आर्थिक उलाढाल मंदावली होती.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

नाशिक : ग्रामीण भागात थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. भाजीपाला आणि टॉमेटो पिकावर थंडीचा अधिक परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी गव्हावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

गांधीनगरमधील पथदीप बंद

नाशिक : गांधीनगर परिसरातील अनेक पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणे धोकादायक ठरू लागले आहे.