शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे ...

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीसही उपस्थित राहात नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रेल्वे सेवेला शेतकऱ्यांची पसंती

नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानाने दोन तासांत दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये जात असले तरी या सेवेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विमानाचे आणि रेल्वेचे भाडे यात मोठी तफावत असल्याने शेतकरी रेल्वेने माल पाठविण्यास अधिक पसंती देतात.

थेट विक्रीमुळे तरुणांना रोजगार

नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या गावांमधील अनेक शेतकरी तरुणांनी शहरात थेट ग्राहकांना माल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगला भाजीपाला व इतर शेतीमाल मिळू लागल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.

लग्नसराईमुळे बाजारपेठेत चैतन्य

नाशिक : लग्नसराईमुळे शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे. मागील आठ ते नऊ महिने लग्नसोहळ्यांना पूरकव्यवसायांवर गडांतर आले होते. त्यामुळे विवाह सोहळ्यांनिमित्ताने होणारी मोठी आर्थिक उलाढाल मंदावली होती.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

नाशिक : ग्रामीण भागात थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. भाजीपाला आणि टॉमेटो पिकावर थंडीचा अधिक परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी गव्हावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

गांधीनगरमधील पथदीप बंद

नाशिक : गांधीनगर परिसरातील अनेक पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणे धोकादायक ठरू लागले आहे.