शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे ...

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली तरी अनेक बेशिस्त वाहनचालक या ठिकाणी थांबत नाहीत. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीसही उपस्थित राहात नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रेल्वे सेवेला शेतकऱ्यांची पसंती

नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानाने दोन तासांत दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये जात असले तरी या सेवेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. विमानाचे आणि रेल्वेचे भाडे यात मोठी तफावत असल्याने शेतकरी रेल्वेने माल पाठविण्यास अधिक पसंती देतात.

थेट विक्रीमुळे तरुणांना रोजगार

नाशिक : शहर परिसरालगत असलेल्या गावांमधील अनेक शेतकरी तरुणांनी शहरात थेट ग्राहकांना माल विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याला शहरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगला भाजीपाला व इतर शेतीमाल मिळू लागल्याने ग्राहक त्याला पसंती देत आहेत.

लग्नसराईमुळे बाजारपेठेत चैतन्य

नाशिक : लग्नसराईमुळे शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून यामुळे अनेकांना रोजगार मिळू लागला आहे. मागील आठ ते नऊ महिने लग्नसोहळ्यांना पूरकव्यवसायांवर गडांतर आले होते. त्यामुळे विवाह सोहळ्यांनिमित्ताने होणारी मोठी आर्थिक उलाढाल मंदावली होती.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

नाशिक : ग्रामीण भागात थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. भाजीपाला आणि टॉमेटो पिकावर थंडीचा अधिक परिणाम जाणवत आहे. काही ठिकाणी गव्हावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

गांधीनगरमधील पथदीप बंद

नाशिक : गांधीनगर परिसरातील अनेक पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी या परिसरातून पायी जाणे धोकादायक ठरू लागले आहे.