शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

नाशिकरोडला चोरट्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: May 14, 2015 00:16 IST

प्रवाशांना फटका : पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात पाकीट व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.नाशिकरोड बसस्थानकावर सकाळपासून रात्री ९-१० पर्यंत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार व रेल्वेने येणारे बहुतांश प्रवासी नाशिकरोड बसस्थानकातील बसेसने ये-जा करतात. रेल्वे, बसस्थानक येथील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पोलीस यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी आहे. कोणी वरिष्ठ अधिकारी येणार असेल तेव्हाच ‘खाकी’ची उपस्थिती दिसते. पाकीटमारांचा सुळसुळाटनाशिकरोड बस व रेल्वेस्थानक परिसरात पाकीटमार व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज अनेक प्रवाशांना पाकीटमार आपला हिसका दाखवितात. मात्र बाहेरगावचे प्रवासी किंवा गाडी येण्याची-सुटण्याची वेळ कशाला पोलिसांशी कटकट यामुळे ९७-९८ टक्के सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, महिला लुटले गेल्यानंतर तक्रार देण्यास येत नाही. त्यामुळे पोलिसांच्यादृष्टीने कागदोपत्री ‘शांती’ आहे असा दावा केला जातो. मात्र चोरीला गेलेले थोडीच पुन्हा मिळणार आहे, गुन्हा दाखल केल्यानंतर चारवेळा पोलीस बोलवतील, त्यांचे शंभर प्रश्न, पंच, जबाब, कोर्टाच्या चकरा, अशा विविध कारणांमुळे खऱ्या अर्थाने कागदोपत्री शांती असते. विशेष म्हणजे पाकीटमारांमध्ये काही महिलांचादेखील समावेश असल्याचे बोलले जाते. नाशिकरोड बसस्थानकावर असलेली पोलीस चौकी ही फक्त नावालाच आहे. चोरी, लूट झाल्याचे समजल्यानंतर संबंधित प्रवासी चौकीत गेल्यावर तेथे आजूबाजूचे रिक्षाचालक संबंधिताना मुख्य पोलीस ठाण्यात पाठवितात.माबाइल चोरट्यांचादेखील चांगलाच सुळसुळाट झाला असून, दररोज बसमधून प्रवास करताना महिलांच्या पर्सची साखळी खोलून किंवा पर्स फाडून रोकड व दागिने चोरीला जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत दाखल झालेल्या पाकीट चोरी, मोबाइल चोरी, मौल्यवान दागिने, रोकड चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. पोलिसांना पाकीटमार-मोबाइल चोरांची माहिती किंवा खबर नाही की काहीतरी सेटिंग आहे हा मात्र संशोधनाचा (तपासाचा) विषय आहे. सिंहस्थ-कुंभमेळा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला असून, यामुळे नाशिकचे नाव खराब होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)