शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नाशिकरोडला चोरट्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: May 14, 2015 00:16 IST

प्रवाशांना फटका : पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात पाकीट व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.नाशिकरोड बसस्थानकावर सकाळपासून रात्री ९-१० पर्यंत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार व रेल्वेने येणारे बहुतांश प्रवासी नाशिकरोड बसस्थानकातील बसेसने ये-जा करतात. रेल्वे, बसस्थानक येथील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पोलीस यंत्रणा व सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी आहे. कोणी वरिष्ठ अधिकारी येणार असेल तेव्हाच ‘खाकी’ची उपस्थिती दिसते. पाकीटमारांचा सुळसुळाटनाशिकरोड बस व रेल्वेस्थानक परिसरात पाकीटमार व मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दररोज अनेक प्रवाशांना पाकीटमार आपला हिसका दाखवितात. मात्र बाहेरगावचे प्रवासी किंवा गाडी येण्याची-सुटण्याची वेळ कशाला पोलिसांशी कटकट यामुळे ९७-९८ टक्के सर्वसामान्य प्रवासी, नागरिक, महिला लुटले गेल्यानंतर तक्रार देण्यास येत नाही. त्यामुळे पोलिसांच्यादृष्टीने कागदोपत्री ‘शांती’ आहे असा दावा केला जातो. मात्र चोरीला गेलेले थोडीच पुन्हा मिळणार आहे, गुन्हा दाखल केल्यानंतर चारवेळा पोलीस बोलवतील, त्यांचे शंभर प्रश्न, पंच, जबाब, कोर्टाच्या चकरा, अशा विविध कारणांमुळे खऱ्या अर्थाने कागदोपत्री शांती असते. विशेष म्हणजे पाकीटमारांमध्ये काही महिलांचादेखील समावेश असल्याचे बोलले जाते. नाशिकरोड बसस्थानकावर असलेली पोलीस चौकी ही फक्त नावालाच आहे. चोरी, लूट झाल्याचे समजल्यानंतर संबंधित प्रवासी चौकीत गेल्यावर तेथे आजूबाजूचे रिक्षाचालक संबंधिताना मुख्य पोलीस ठाण्यात पाठवितात.माबाइल चोरट्यांचादेखील चांगलाच सुळसुळाट झाला असून, दररोज बसमधून प्रवास करताना महिलांच्या पर्सची साखळी खोलून किंवा पर्स फाडून रोकड व दागिने चोरीला जाण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत दाखल झालेल्या पाकीट चोरी, मोबाइल चोरी, मौल्यवान दागिने, रोकड चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. पोलिसांना पाकीटमार-मोबाइल चोरांची माहिती किंवा खबर नाही की काहीतरी सेटिंग आहे हा मात्र संशोधनाचा (तपासाचा) विषय आहे. सिंहस्थ-कुंभमेळा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला असून, यामुळे नाशिकचे नाव खराब होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून पाकीटमार टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)