शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आवक घटली : पितृपक्षात मागणी वाढली भाज्या महागल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:33 IST

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला व फळभाज्यांची नासाडी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यातच पितृपक्षात भाज्यांची मागणी वाढल्याने बाजारभाव भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

पंचवटी : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे भाजीपाला व फळभाज्यांची नासाडी झाल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यातच पितृपक्षात भाज्यांची मागणी वाढल्याने बाजारभाव भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.गणेशोत्सवात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजार समितीत येणाºया भाजीपाला-फळभाज्यांच्या आवकेवरही त्याचा परिणाम झाला. गेल्या चार-पाच दिवसात पावसाने उघडीप दिली असली तरी अजूनही भाजीपाल्याची आवक वाढलेली नाही. त्यामुळे भाज्यांचे दर वधारले आहेत. त्यातच सध्या पितृपक्ष सुरु असल्याने भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. प्रामुख्याने, पितृपक्षात पितरांना भोजन घालण्यासाठी दाखविल्या जाणाºया नैवेद्यात विविध प्रकारच्या भाज्या असतात. या भाज्यांची आवक कमी होत असल्याने त्यांचे दर वधारले आहेत. नाशिक बाजार समितीत कारली २०० रुपये जाळी, डांगर २५ रुपये, दोडके १५० रुपये जाळी, तर मेथीला दहा ते तीस रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. किरकोळ बाजारातकारली ४० रुपये प्रतिकिलो, डांगर ४० रुपये, दोडके ६० रुपये, गवार ८० रुपये किलो तर भेंडी ४० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावी लागत आहे.