शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची अशुद्धता ठरते आजारांना निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ...

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ते नागरिकांच्या घरी पोहोचल्यास पाण्याच्या अशा अशुद्धीमुळे जणू अनेक आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. मात्र प्रत्येक कुटुंबाने जर उकळलेले पाणी पिल्यास या जलजन्य आजारांची शक्यताच संपुष्टात येऊ शकते.

पाण्यावर तुरटी फिरवून गाळ खाली बसल्यानंतरच पाणी प्यावे, मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे, त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणे, पाणी पिणे टाळणे आवश्यक असते. पाणीपुरी, भेळ तसेच अन्य पाण्याचा अंतर्भाव असलेले पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पिल्यास शरीराला आराम मिळू शकतो.

इन्फो

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाणी पोटात गेल्यास अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. त्यात जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, पोटातील कृमींची वाढ यांसारखे आजार होतात. दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्धच असण्याबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक असते.

इन्फो

आजारांची लक्षणे

गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणं दिसू लागतात. पोटात खूप दुखतं, कळा येतात. तीन ते चार दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. दूषित पाण्यामुळे काविळीसारखा आजार होतो. उलट्या, ताप, डोळे तसेच लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

इन्फो

पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून प्यायल्यास निम्म्याहून अधिक जलजन्य आजारांची शक्यता संपुष्टात येते. विशेषत्वे त्यातील गॅस्ट्रो, टायफॉईड यासारखे जिवावर बेतणारे आजार तरी नक्कीच टाळता येऊ शकतात.

इन्फो

२० लिटर उकळलेले पाणी कुटुंबाला ठेवेल निरोगी

महानगराच्या क्षेत्रात नाशिक मनपाकडून दररोज १८० लिटर पाणीपुरवठा केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्ती दिवसाला किमान ३ ते ४ लीटर पाणी पितो, असे जरी गृहीत धरले तरी एका कुटुंबासाठी केवळ १६ ते २० लीटरपर्यंत दररोज पाणी उकळून घेण्याची गरज असते. म्हणजेच दररोज उकळलेले २० लिटर पाणी हे संपूर्ण कुटुंबाला जलजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.