शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

पाण्याची अशुद्धता ठरते आजारांना निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:19 IST

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ...

नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी-नाल्यांतून धरणात येणारे बहुतांश पाणी अशुद्ध असते. त्यावर योग्य प्रक्रिया न होताच ते नागरिकांच्या घरी पोहोचल्यास पाण्याच्या अशा अशुद्धीमुळे जणू अनेक आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. मात्र प्रत्येक कुटुंबाने जर उकळलेले पाणी पिल्यास या जलजन्य आजारांची शक्यताच संपुष्टात येऊ शकते.

पाण्यावर तुरटी फिरवून गाळ खाली बसल्यानंतरच पाणी प्यावे, मेडिक्लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे, त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ हा तळाशी जाऊन आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं. पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खाणे, पाणी पिणे टाळणे आवश्यक असते. पाणीपुरी, भेळ तसेच अन्य पाण्याचा अंतर्भाव असलेले पदार्थ खाणे टाळणे आवश्यक असते. उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत पिल्यास शरीराला आराम मिळू शकतो.

इन्फो

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाणी पोटात गेल्यास अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. त्यात जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, पोटातील कृमींची वाढ यांसारखे आजार होतात. दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्धच असण्याबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक असते.

इन्फो

आजारांची लक्षणे

गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणं दिसू लागतात. पोटात खूप दुखतं, कळा येतात. तीन ते चार दिवसांत प्रकर्षाने ताप येतो. दूषित पाण्यामुळे काविळीसारखा आजार होतो. उलट्या, ताप, डोळे तसेच लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. टायफॉईड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

इन्फो

पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करता येऊ शकतो. पाणी उकळून प्यायल्यास निम्म्याहून अधिक जलजन्य आजारांची शक्यता संपुष्टात येते. विशेषत्वे त्यातील गॅस्ट्रो, टायफॉईड यासारखे जिवावर बेतणारे आजार तरी नक्कीच टाळता येऊ शकतात.

इन्फो

२० लिटर उकळलेले पाणी कुटुंबाला ठेवेल निरोगी

महानगराच्या क्षेत्रात नाशिक मनपाकडून दररोज १८० लिटर पाणीपुरवठा केले जाते. त्यात प्रत्येक व्यक्ती दिवसाला किमान ३ ते ४ लीटर पाणी पितो, असे जरी गृहीत धरले तरी एका कुटुंबासाठी केवळ १६ ते २० लीटरपर्यंत दररोज पाणी उकळून घेण्याची गरज असते. म्हणजेच दररोज उकळलेले २० लिटर पाणी हे संपूर्ण कुटुंबाला जलजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.