शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:18 IST

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.

ठळक मुद्दे अंतिम फेरीत धडक : अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी जिंकला सामना

सुरगाणा : अमरावतीच्या बोरगाव मंजूजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या नाशिक विभागातील संघ, सुरगाणा तालुक्यातील खेळाडूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी जखमींना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. या अपघातातून बचावलेल्या खेळाडूंनी स्पर्धेतील उपान्त्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील खा- खो चा संघ अमरावती येथे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दोन जीपमधून जात असताना बोरगाव मंजूजवळ खेळाडूंच्या एका जीपला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली होती. त्यामुळे झालेल्या अपघातात इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी कल्पेश सहारे (रा. धामणकुंड), प्रभाकर धूम (हातरु ंडी), तर शिक्षक टी.आर. गावित, एम.डी. पवार, जीप चालक सुरेश गावित (अलंगुण) हे जखमी झाले होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या पाच जखमींवर उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेले क्रीडाशिक्षक एन. एस. तायडे यांनी दिली.या अपघातात सुखरूप असलेल्या उर्वरित खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम खेळ केला. दडपण असूनही या खेळाडूंनी अमरावती विरोधात असलेला पहिलाच सामना अलंगुण संघाने म्हणजे नाशिक विभागाने दोन गुणांनी विजय संपादन केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये मुंबई संघाविरु द्ध दणदणीत विजय संपादन केला असून, शुक्रवारी (दि. २९) लातूर संघाविरु द्ध अंतिम फेरीचा सामना होणार आहे. मोठा अपघात होऊनही या खेळाडूंनी अपघाताचे दडपण न ठेवता अंतिम सामन्यापर्यंत बाजी मारलीआहे.अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक व माजी आमदार जे.पी. गावित यांचे सुपुत्र हिरामण गावित यांना अपघाताचे वृत्त समजताच थेट अमरावतीमधील अकोला गाठून अपघातातील सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. हिरामण गावित यांच्यासह प्राचार्य के. एल. वाघचौरे, शिक्षक एन.जी. लांडगे, रामभाऊ थोरात, बाळू गावित, एन.एस. तायडे हे त्यांच्यासोबत असून, रु ग्णालयातून पाचही जणांना सोडण्यात आल्यानंतर त्यांना घरी घेऊन निघाले होते.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अकोला प्रकल्प अधिकारी हिवाळे तसेच जिल्हा क्र ीडा अधिकारी यांनी रु ग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.उर्वरित सर्व मुले सुखरूप असून, अमरावती येथे स्पर्धेत खेळत आहे. चिंतामण चौधरी (रा. बाफळून), मच्छिंद्र वाघमारे (रा. कुकुडमुंडा), श्याम गायकवाड (रा. कोठूला), किरण जाधव (रा. तोरडोंगरी), रोशन सहारे (धामणकुंड), उत्तम गवळी (गाळबारी), चेतन चौधरी (धुरापाडा), कौशिक चौधरी (बाफळून), श्याम गायकवाड (वांगण), नीलेश भुसारे (तोरडोंगरी) अशी त्यांची नावे आहेत.