शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आधी सेवा सुधारा, मग करा दरवाढीचा विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:36 IST

वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

नाशिक : वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.  त्रुटींची भरपाई करताना त्याचा भार सातत्याने ग्राहकांवर टाकला जात आहे. त्याऐवजी इतर पर्यायांचा मंडळाने विचार करावा, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायत समिती सदस्य, सर्वसामान्य नागरिक, माजी  मुख्य अभियंता यांच्याशी साधलेला हा संवाद.वीज दरवाढ ही नैमित्तिक गोष्ट बनली आहे. दरवाढ करण्याआधी पुरवठा कसा आहे? सेवा कशी आहे? वसुली पूर्णपणे होते का?, गैरप्रकारांचे काय? या प्रश्नांची उत्तरे मंडळाने द्यावीत. वीजचोरी कमी व्हायचे नाव घेत नाही. असे असताना शासनाने वीज दरवाढीचा विचारही करू नये. - दिलीप फडकेवीज दरवाढ या गोष्टीला समर्थनच असू शकत नाही. ही ग्राहक हिताविरोधी कृती आहे. कारण आधीच विजेचे दर जास्त आहे. त्यात खोटे हिशेब, अवास्तव बिल या अनुचित प्रथांमुळे ग्राहक भरडला जात आहे. शेतकऱ्यांना अंदाजे बिल देऊन त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून दरवाढीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. ४० टक्के कृषी ग्राहकांना अंदाजपंचे बिल दिले जाते. - विलास देवळेवीज खरेदीचे दर कमी होत असताना वीज दरवाढ का केली जात आहे हे समजत नाही. कृषी क्षेत्राला अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षात आलेले उत्पन्न पाहता जास्त महसूल आलेला दिसतो आहे; मात्र प्रत्यक्ष थकबाकी खूप आहे. वसुलीचे गांभीर्य दिसत नाही. प्रस्तावित दरवाढीत कृषिपंपांची दरवाढ खूपच जास्त आहे. गळती कमी झाली आहे तरीही वीज दरवाढ होते आहे हे चुकीचे आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी भरडले जाणार आहेत.  - अरविंद गडाख, माजी मुख्य अभियंता, वीज महामंडळ

टॅग्स :electricityवीज