शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

आधी सेवा सुधारा, मग करा दरवाढीचा विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:36 IST

वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

नाशिक : वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.  त्रुटींची भरपाई करताना त्याचा भार सातत्याने ग्राहकांवर टाकला जात आहे. त्याऐवजी इतर पर्यायांचा मंडळाने विचार करावा, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायत समिती सदस्य, सर्वसामान्य नागरिक, माजी  मुख्य अभियंता यांच्याशी साधलेला हा संवाद.वीज दरवाढ ही नैमित्तिक गोष्ट बनली आहे. दरवाढ करण्याआधी पुरवठा कसा आहे? सेवा कशी आहे? वसुली पूर्णपणे होते का?, गैरप्रकारांचे काय? या प्रश्नांची उत्तरे मंडळाने द्यावीत. वीजचोरी कमी व्हायचे नाव घेत नाही. असे असताना शासनाने वीज दरवाढीचा विचारही करू नये. - दिलीप फडकेवीज दरवाढ या गोष्टीला समर्थनच असू शकत नाही. ही ग्राहक हिताविरोधी कृती आहे. कारण आधीच विजेचे दर जास्त आहे. त्यात खोटे हिशेब, अवास्तव बिल या अनुचित प्रथांमुळे ग्राहक भरडला जात आहे. शेतकऱ्यांना अंदाजे बिल देऊन त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून दरवाढीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. ४० टक्के कृषी ग्राहकांना अंदाजपंचे बिल दिले जाते. - विलास देवळेवीज खरेदीचे दर कमी होत असताना वीज दरवाढ का केली जात आहे हे समजत नाही. कृषी क्षेत्राला अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षात आलेले उत्पन्न पाहता जास्त महसूल आलेला दिसतो आहे; मात्र प्रत्यक्ष थकबाकी खूप आहे. वसुलीचे गांभीर्य दिसत नाही. प्रस्तावित दरवाढीत कृषिपंपांची दरवाढ खूपच जास्त आहे. गळती कमी झाली आहे तरीही वीज दरवाढ होते आहे हे चुकीचे आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी भरडले जाणार आहेत.  - अरविंद गडाख, माजी मुख्य अभियंता, वीज महामंडळ

टॅग्स :electricityवीज