शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आधी सेवा सुधारा, मग करा दरवाढीचा विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:36 IST

वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.

नाशिक : वीज महामंडळ लवकरच वीज दरवाढ करण्याच्या पवित्र्यात आहे. वीज दरवाढ जरूर करावी; मात्र ती करण्याआधी मंडळाने आपली सेवा सुधारणे, त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.  त्रुटींची भरपाई करताना त्याचा भार सातत्याने ग्राहकांवर टाकला जात आहे. त्याऐवजी इतर पर्यायांचा मंडळाने विचार करावा, वीज निर्मितीमधील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा अशा भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायत समिती सदस्य, सर्वसामान्य नागरिक, माजी  मुख्य अभियंता यांच्याशी साधलेला हा संवाद.वीज दरवाढ ही नैमित्तिक गोष्ट बनली आहे. दरवाढ करण्याआधी पुरवठा कसा आहे? सेवा कशी आहे? वसुली पूर्णपणे होते का?, गैरप्रकारांचे काय? या प्रश्नांची उत्तरे मंडळाने द्यावीत. वीजचोरी कमी व्हायचे नाव घेत नाही. असे असताना शासनाने वीज दरवाढीचा विचारही करू नये. - दिलीप फडकेवीज दरवाढ या गोष्टीला समर्थनच असू शकत नाही. ही ग्राहक हिताविरोधी कृती आहे. कारण आधीच विजेचे दर जास्त आहे. त्यात खोटे हिशेब, अवास्तव बिल या अनुचित प्रथांमुळे ग्राहक भरडला जात आहे. शेतकऱ्यांना अंदाजे बिल देऊन त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून दरवाढीच्या माध्यमातून वसूल केली जात आहे. ४० टक्के कृषी ग्राहकांना अंदाजपंचे बिल दिले जाते. - विलास देवळेवीज खरेदीचे दर कमी होत असताना वीज दरवाढ का केली जात आहे हे समजत नाही. कृषी क्षेत्राला अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्षात आलेले उत्पन्न पाहता जास्त महसूल आलेला दिसतो आहे; मात्र प्रत्यक्ष थकबाकी खूप आहे. वसुलीचे गांभीर्य दिसत नाही. प्रस्तावित दरवाढीत कृषिपंपांची दरवाढ खूपच जास्त आहे. गळती कमी झाली आहे तरीही वीज दरवाढ होते आहे हे चुकीचे आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी भरडले जाणार आहेत.  - अरविंद गडाख, माजी मुख्य अभियंता, वीज महामंडळ

टॅग्स :electricityवीज