शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०१२-१३ वर्ष ठरले पालिकेसाठी महत्त्वपूर्ण

By admin | Updated: August 4, 2015 23:56 IST

सर्वाधिक वसुली : ‘त्या’ उत्पन्नावरच मिळणार शासन अनुदान

नाशिक : सन २०१२ मध्ये महापालिकेने जकातीच्या खासगीकरणाचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि जकात वसुलीची सूत्रे पुनश्च महापालिकेने हाती घेतल्यानंतर वर्षभरात सन २०१२-१३ मध्ये तब्बल ६९५ कोटी रुपयांची विक्रमी जकात वसुली केली होती. आता एलबीटी रद्द झाल्यानंतर याच सर्वाधिक वसुलीवर आधारित महापालिकेला शासनाकडून अनुदान उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वी वसुलीसाठी केलेल्या मेहनतीचे फळ आता पालिकेला बऱ्यापैकी उपलब्ध होणाऱ्या अनुदानाच्या रूपाने चाखायला मिळणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सन २०१०-११ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी जकात खासगीकरणाचा प्रयोग राबविण्यात आला होता. जकात खासगीकरणातून पालिकेला २०१०-११ मध्ये ४९४ कोटी, तर २०११-१२ मध्ये ५२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर जकात खासगीकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने सर्वाधिक जागा मिळवित सत्ता हस्तगत केली. डाव्या पक्षांनीही खासगीकरणाविरोधी आंदोलने केली. त्यानंतर पहिल्याच महासभेत मनसेने जकातीचे खासगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि जकात वसुलीची सूत्रे पुन्हा महापालिकेच्या हाती आली. सन २०१२-१३ या वर्षात महापालिकेने पुन्हा एकदा जकातीसाठी आपली सारी ताकद पणाला लावली. कर उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सूत्रे हाती घेत वसुली मोहीम कडक केली. वसुलीसाठी कुशल यंत्रणा कामाला लावली. तत्कालीन प्रभारी आयुक्त पी. वेलरासू यांनीही जातीने लक्ष घालत वसुलीवर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणून सन २०१२-१३ मध्ये ६९५.१४ कोटी रुपयांची विक्रमी जकात वसुली झाली. वर्षभरातच तब्बल १७० कोटी रुपयांनी करवसुलीत वाढ झाली.