शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

२०१२-१३ वर्ष ठरले पालिकेसाठी महत्त्वपूर्ण

By admin | Updated: August 4, 2015 23:56 IST

सर्वाधिक वसुली : ‘त्या’ उत्पन्नावरच मिळणार शासन अनुदान

नाशिक : सन २०१२ मध्ये महापालिकेने जकातीच्या खासगीकरणाचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि जकात वसुलीची सूत्रे पुनश्च महापालिकेने हाती घेतल्यानंतर वर्षभरात सन २०१२-१३ मध्ये तब्बल ६९५ कोटी रुपयांची विक्रमी जकात वसुली केली होती. आता एलबीटी रद्द झाल्यानंतर याच सर्वाधिक वसुलीवर आधारित महापालिकेला शासनाकडून अनुदान उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वी वसुलीसाठी केलेल्या मेहनतीचे फळ आता पालिकेला बऱ्यापैकी उपलब्ध होणाऱ्या अनुदानाच्या रूपाने चाखायला मिळणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सन २०१०-११ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी जकात खासगीकरणाचा प्रयोग राबविण्यात आला होता. जकात खासगीकरणातून पालिकेला २०१०-११ मध्ये ४९४ कोटी, तर २०११-१२ मध्ये ५२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर जकात खासगीकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने सर्वाधिक जागा मिळवित सत्ता हस्तगत केली. डाव्या पक्षांनीही खासगीकरणाविरोधी आंदोलने केली. त्यानंतर पहिल्याच महासभेत मनसेने जकातीचे खासगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि जकात वसुलीची सूत्रे पुन्हा महापालिकेच्या हाती आली. सन २०१२-१३ या वर्षात महापालिकेने पुन्हा एकदा जकातीसाठी आपली सारी ताकद पणाला लावली. कर उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सूत्रे हाती घेत वसुली मोहीम कडक केली. वसुलीसाठी कुशल यंत्रणा कामाला लावली. तत्कालीन प्रभारी आयुक्त पी. वेलरासू यांनीही जातीने लक्ष घालत वसुलीवर भर दिला. त्याचाच परिणाम म्हणून सन २०१२-१३ मध्ये ६९५.१४ कोटी रुपयांची विक्रमी जकात वसुली झाली. वर्षभरातच तब्बल १७० कोटी रुपयांनी करवसुलीत वाढ झाली.