शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण : अ‍ॅड. पवार कळवण : महाविद्यालयात ज्ञानविस्तार कार्यक्र मांतर्गत व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:36 IST

कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे असणाऱ्या हक्कांचे जागतिक स्वरूप मानवी हक्क संकल्पनेत समाविष्ट असल्याने मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी व्यक्त केले.

कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे असणाऱ्या हक्कांचे जागतिक स्वरूप मानवी हक्क संकल्पनेत समाविष्ट असल्याने मानवी हक्कांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे ज्ञानविस्तार कार्यक्र मांतर्गत मानवी हक्क या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. यू. आर. शिंदे होत्या.अ‍ॅड. पवार पुढे म्हणाले की,गुलामगिरी अस्तित्वात असताना त्यात लोकांना अमानवी व अमानुष वागणूक दिली जात होती. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी मुक्तीसाठी मोठे प्रयत्न केले. सर्व मानव समान असल्याने मार्टिन ल्यूथर किंगने सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी मोठा लढा दिला. भारतातही अनेक वर्ष जातीधर्म भेदभाव, सतीसारख्या अमानुष कुप्रथाविरोधात समाजसुधारकांनी लढा देऊन मानवी हक्कांची जाणीव करून दिल्याचे अ‍ॅड. पवार म्हणाले. प्रा.पी.एम. जाधव यांनी राज्यघटनेतील विविध कलमे, हक्क यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य यू. आर. शिंदे यांनी मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. यू. के. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एम. बी. घोडके यांनी केले. कार्यक्र मास उपप्राचार्य एन.के.आहेर, गांगुर्डे, नंदनवरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.