शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:47 IST

परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : वातावरणाचा परिणाम

खेडलेझुंगे : परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.वातावरणातील नियमितच्या बदलांमुळे सर्व शेतपिकांवर परिणाम झाला आहे. त्याप्रमाणे फळबागांवरही त्याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी आॅक्टोबरपासून आंबा मोहरू लागतो. खरा मोहर येतो तो नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान. सर्वसाधारण यादरम्यानच मोहरात कणी तयार होते. कणी म्हणजे फुलातून बाहेर आलेले अतिसूक्ष्म आंब्याचे फळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा त्याआधीही बाजारात येतो. मात्र खरा हंगाम हा मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. परंतु यावर्षी उशिराझालेल्या पावसामुळे सर्व शेतीचे गणिते उलटली आहे. कांदा असो वा आंबा सर्वच पिकांना उशीर झालेला आहे. यावर्षी जानेवारी पूर्णत: संपलेला असून, खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, धरणगाव, सारोळे थडी परिसरातील एकाही आंब्याला मोहर आलेला नाही. लोणच्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गावठीकैऱ्या बाजारात मिळत होत्या. परंतु यावर्षी येथील रहिवाशांनाच लोणच्यासाठी कैºया विकत घेण्याची वेळ आली आहे.पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने हंगाम लांबणारजून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम आहे; मात्र यावेळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस झाल्याने जमिनीतील ओल कायम राहिल्यामुळे शेतपिकांसह आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओल कायम राहिल्याने जानेवारीअखेरपर्यंत आंब्याला मोहर आलेला नाही. आंब्याला मोहर येण्यासाठी ठरावीक तापमानाची गरज असते. सतत बदलणाºया हवामानामुळे हा कालावधी लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.साधारणपणे सप्टेंबरअखेर पावसाचे प्रमाण कमी होते.मात्र यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. पावसाचे वेळापत्रक दोन महिने पुढे सरकत असल्याने आंबा मोहराचा हंगामही पुढे सरकल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. इतक्या उशिराने येणारा आंबा, बाजारात दाखल होण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळणार नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आंबा या फळपिकास समप्रमाणात थंडीची आवश्यकता असते. यंदा तापमान हे कमी-अधिक झाल्यामुळे आंब्यास मोहर येण्यावर परिणाम झाला. यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रताप मोगरे, कृषी पर्यवेक्षक

टॅग्स :Mangoआंबा