शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

आंबा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:47 IST

परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : वातावरणाचा परिणाम

खेडलेझुंगे : परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.वातावरणातील नियमितच्या बदलांमुळे सर्व शेतपिकांवर परिणाम झाला आहे. त्याप्रमाणे फळबागांवरही त्याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी आॅक्टोबरपासून आंबा मोहरू लागतो. खरा मोहर येतो तो नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान. सर्वसाधारण यादरम्यानच मोहरात कणी तयार होते. कणी म्हणजे फुलातून बाहेर आलेले अतिसूक्ष्म आंब्याचे फळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा त्याआधीही बाजारात येतो. मात्र खरा हंगाम हा मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. परंतु यावर्षी उशिराझालेल्या पावसामुळे सर्व शेतीचे गणिते उलटली आहे. कांदा असो वा आंबा सर्वच पिकांना उशीर झालेला आहे. यावर्षी जानेवारी पूर्णत: संपलेला असून, खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, धरणगाव, सारोळे थडी परिसरातील एकाही आंब्याला मोहर आलेला नाही. लोणच्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गावठीकैऱ्या बाजारात मिळत होत्या. परंतु यावर्षी येथील रहिवाशांनाच लोणच्यासाठी कैºया विकत घेण्याची वेळ आली आहे.पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने हंगाम लांबणारजून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम आहे; मात्र यावेळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस झाल्याने जमिनीतील ओल कायम राहिल्यामुळे शेतपिकांसह आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओल कायम राहिल्याने जानेवारीअखेरपर्यंत आंब्याला मोहर आलेला नाही. आंब्याला मोहर येण्यासाठी ठरावीक तापमानाची गरज असते. सतत बदलणाºया हवामानामुळे हा कालावधी लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.साधारणपणे सप्टेंबरअखेर पावसाचे प्रमाण कमी होते.मात्र यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. पावसाचे वेळापत्रक दोन महिने पुढे सरकत असल्याने आंबा मोहराचा हंगामही पुढे सरकल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. इतक्या उशिराने येणारा आंबा, बाजारात दाखल होण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळणार नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आंबा या फळपिकास समप्रमाणात थंडीची आवश्यकता असते. यंदा तापमान हे कमी-अधिक झाल्यामुळे आंब्यास मोहर येण्यावर परिणाम झाला. यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रताप मोगरे, कृषी पर्यवेक्षक

टॅग्स :Mangoआंबा