शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

आंबा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:47 IST

परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : वातावरणाचा परिणाम

खेडलेझुंगे : परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे.वातावरणातील नियमितच्या बदलांमुळे सर्व शेतपिकांवर परिणाम झाला आहे. त्याप्रमाणे फळबागांवरही त्याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी आॅक्टोबरपासून आंबा मोहरू लागतो. खरा मोहर येतो तो नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान. सर्वसाधारण यादरम्यानच मोहरात कणी तयार होते. कणी म्हणजे फुलातून बाहेर आलेले अतिसूक्ष्म आंब्याचे फळ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा त्याआधीही बाजारात येतो. मात्र खरा हंगाम हा मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. परंतु यावर्षी उशिराझालेल्या पावसामुळे सर्व शेतीचे गणिते उलटली आहे. कांदा असो वा आंबा सर्वच पिकांना उशीर झालेला आहे. यावर्षी जानेवारी पूर्णत: संपलेला असून, खेडलेझुंगे, रुई, कोळगाव, धरणगाव, सारोळे थडी परिसरातील एकाही आंब्याला मोहर आलेला नाही. लोणच्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गावठीकैऱ्या बाजारात मिळत होत्या. परंतु यावर्षी येथील रहिवाशांनाच लोणच्यासाठी कैºया विकत घेण्याची वेळ आली आहे.पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने हंगाम लांबणारजून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम आहे; मात्र यावेळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस झाल्याने जमिनीतील ओल कायम राहिल्यामुळे शेतपिकांसह आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओल कायम राहिल्याने जानेवारीअखेरपर्यंत आंब्याला मोहर आलेला नाही. आंब्याला मोहर येण्यासाठी ठरावीक तापमानाची गरज असते. सतत बदलणाºया हवामानामुळे हा कालावधी लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.साधारणपणे सप्टेंबरअखेर पावसाचे प्रमाण कमी होते.मात्र यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही पाऊस सुरू होता. पावसाचे वेळापत्रक दोन महिने पुढे सरकत असल्याने आंबा मोहराचा हंगामही पुढे सरकल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. इतक्या उशिराने येणारा आंबा, बाजारात दाखल होण्यासही वेळ लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांना योग्य भाव मिळणार नसल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.आंबा या फळपिकास समप्रमाणात थंडीची आवश्यकता असते. यंदा तापमान हे कमी-अधिक झाल्यामुळे आंब्यास मोहर येण्यावर परिणाम झाला. यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- प्रताप मोगरे, कृषी पर्यवेक्षक

टॅग्स :Mangoआंबा