शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलाचा फटका; उन्हाचाही चटका वाढल्याने तब्येत सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:17 IST

नाशिक : पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी ...

नाशिक : पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. कधी पाऊस, कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदलामुळे पावसाळ्यात सर्वच वयोगटात ताप येण्याचे प्रमाण वाढते. हा ताप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. संसर्गजन्य तापाखेरीज मुदतीचा ताप, तीन दिवसांत जाणारा ताप, अंगदुखीनंतर येणारा ताप असे तापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ताप हा अनेकदा जंतुदोषामुळे येतो. लहान मुलांना येणारा ताप हा बहुधा संसर्गाचा ताप असतो, तर मोठ्या व्यक्तीमध्ये बारीक तापातून मुदतीचा दीर्घ काळ लांबणारा ताप असतो.

हवामानातील बदल व ताप पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर तापाची साथ अधिक जोरात असते. हवामानातील बदलामुळे, दूषित पाणी, अस्वच्छता, साचून राहिलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य तापाचे प्रमाण वाढते. तापाचे वारंवार येणारा, कमी-जास्त होणारा आणि मुरलेला ताप असे ढोबळमानाने तीन प्रकारांत वर्गीकरण करता येते. कमी-जास्त होणारा ताप हा दीर्घकाळ राहतो. तो चढ-उतार करतो. कावीळ, विषमज्वर या प्रकारात तो सर्रास आढळतो. मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा दोष किंवा एखाद्या छोट्या गाठीमुळे येणाऱ्या तापामध्ये एकदम थंडी वाजून येते. हा ताप पूर्ण उतरतो आणि नंतर खूप चढतो. यात आधी थंडी वाजते, मग ताप येतो. खूप दिवस टिकणाऱ्या तापाला बारीक ताप असे म्हणतात. जुन्या दुखण्यांमधील तापाचे प्रमाण पावसाळ्यात पूर्वी वाढत असे. मात्र, आता वैद्यकीय उपचारांमुळे तापाचे वेळीच निदान होऊन तो बरा होण्याचे प्रमाण वाढले आहे.

उपचाराचा पहिला टप्पा

थोडासा ताप असेल तर कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो. कोलन वॅाटर वा गार पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवाव्यात. एका दिवसात या प्राथमिक उपायांनी बरे न वाटल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते. ताप दोन ते तीन दिवस टिकला तर लक्षणानुरूप डॅाक्टरांच्या सल्ल्याने रक्त, तसेच अन्य तपासण्या करून घ्याव्यात.

लक्षणे आणि निदान

तापात अंगाला सूज येणे, घसा दुखणे, अंगदुखी होणे, लघवी पिवळी होणे, मान सतत दुखणे, पोटात जळजळ होणे अशी लक्षणे आढळतात. दूषित पाण्याने होणाऱ्या संसर्गातील तापात सतत पातळ शौचास होणे, पोटात मुरडा येऊन घेरी आल्यासारखे वाटणे ही लक्षणेही तीव्र असतात. तापातील ही लक्षणे डॅाक्टरांना सांगायला हवीत. कारण त्यामुळे तापाच्या प्रकाराचे निदान सोपे जाते.

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

पावसाळ्यात उन्हाने येणाऱ्या तापाला आजारांवर काही साधेसोपे घरगुती उपचार सुचविले आहेत. या उपचारांच्या मदतीने भारतातील लोक संक्रमणापासून आणि डेंग्यू, मलेरिया किंवा व्हायरल तापासारख्या आजारांपासून दूर राहू शकतील. हंगामी तापाच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यात अडचण, नाक बंद होणे, खोकला, अंगदुखी होणे, डोकेदुखी, स्नायूंमध्ये ताण निर्माण होणे यासारखी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ घरगुती उपचार घ्यावेत, जर त्रास वाढतच गेला, तर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

इन्फो

काही प्राथमिक उपाययोजना

हवामानातील बदलाला जेव्हा शरीर अनुकूल नसते, तेव्हा शरीराला ताप, सर्दी, खोकला यासारख्या सामान्य आजारांना सामोरे जावे लागते. या शिवाय अन्य जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचासुद्धा धोका असतो. त्यामुळे काही उपाययोजना आवश्यक असतात. ज्या जनतेला तापाच्या आजारापासून दूर ठेवतात. हे उपाय केवळ तापच नाही, तर सर्दी, खोकला आणि तत्सम सर्व आजारांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात. त्यात हळदीचे दूध, पाणी उकळून पिणे, थोडेसे कोमट पाणी पिणे, आवश्यक असते.