शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

बागलाणमधील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

बागलाण तालुक्यात दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुमारे ८०० ...

बागलाण तालुक्यात दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे लाखो रुपये खर्च करून सुमारे ८०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पीक पूर्णपणे बाधित होऊन वाया गेले आहे. यामुळे अर्ली द्राक्ष पीक घेणाऱ्या उत्पादकांचा यंदाचा हंगामच वाया जाऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून नेला. तीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. महागडे बियाणे खरेदी करून कांद्याची रोपे तयार केली. एकरी हजारो रुपये खर्च करून लागवड केली, मात्र या अवकाळी पावसाने काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाचे स्वप्न धुळीस मिळाले. अवकाळीने सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा पीक करपा रोगाने बाधित झाले आहे. तसेच बहुतांश शेवगा पीक, रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही पिकेदेखील बाधित झाली आहेत. या अस्मानी संकटामुळे बळीराजाचे पूर्णपणे कंबरडे मोडले असून, बाधित पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी आमदार दिलीप बोरसे यांनी मंगळवारी (दि. १५) कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन साकडे घातले. याची दखल घेत भुसे यांनी बाधित पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर भरपाईसाठी तो शासनाकडे सादर करण्यात येईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

===Photopath===

151220\15nsk_19_15122020_13.jpg

===Caption===

बागलाण तालुक्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, शेवगा तसेच रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी या मागणीचे पत्र कृषी मंत्री दादा भुसे यांना सादर करतांना आमदार दिलीप बोरसे.१५ सटाणा १