शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

फुटलेल्या डावा तट कालव्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 16, 2016 23:53 IST

मखमलाबाद : रब्बी हंगाम वाया, खरीप धोक्यात

सिद्धपिंप्री : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मखमलाबाद परिसरातून गेलेला नाशिक डावा तट कालवा अनेक ठिकाणी फुटला असून, अद्यापही कालव्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. सदर बाब सिद्धपिंप्री आणि ओढा येथील रहिवाशांनी पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नाशिक डावा तट कालवा मखमलाबाद परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यातही आलेली आहे, मात्र अद्यापही कालव्याची पाहणीदेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दुरुस्ती कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्नही विचारला जात आहे. फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोंडावर हंगाम आल्याने लागलीच या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मात्र कालव्याची अद्याप पाहणीदेखील करण्यात आलेली नाही. सदर कामाला २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामाची चिंता लागली आहे. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम तर वाया गेला आहेच, जर पाटबंधारे विभागाने या कालव्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर २५ ते ३० गावांचे पाण्याअभावी द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सदर बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी सिद्धपिंप्री शेतकरी भाऊसाहेब ढिकले, सोसायटी अध्यक्ष यशवंत ढिकले, उपाध्यक्ष राजाराम वराडे, उपसरपंच सुका पवार, सुरेश साळुंके, भाऊसाहेब नाना ढिकले, बाळासाहेब ढिकले, विष्णूदादा पेखळे, नामदेव ढिकले, सुरेश ढिकले आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)