शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

कारगिल शहीद जवानांच्या कुटुंबीयांची उपेक्षा

By admin | Updated: July 26, 2014 00:54 IST

शेतजमिनीसाठी शासनाकडून टोलवाटोलवी : १५ वर्षांपासून ‘त्यांची’ होतेय फरफट

नाशिक : आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे़ परंतु कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन शहिदांच्या कुटुंबाची शेतजमिनीसाठी मात्र शासनाकडून उपेक्षा होत आहे़ आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. यामुळे २६ जुलै हा विजय दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो़ या युद्धात ६ जून १९९९ रोजी जिल्ह्यातील सुरेश विष्णू सोनवणे (रा. काजीसांगवी, ता. चांदवड) आणि एकनाथ चैत्राम खैरनार (रा. देवघट, ता. मालेगाव) या नाशिक जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले. या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबाची आर्थिकस्थिती जेमतेम होती. शहीद झालेल्या सुरेश सोनवणे यांच्या पत्नी सुरेखा यांना जिल्हा परिषदेत नोकरी देण्यात आली, तर एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा यांना पेट्रोलपंप देण्यात आला या स्वरूपात या कुटुंबीयांना शासकीय मदतीचा हात मिळाला, परंतु लष्करी सेवेत असताना वीरमरण आल्यानंतर शासनाकडून जमीन दिली जाते. परंतु या कुटुंबीयांना अद्याप जमीन देण्यात आलेली नाही. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची उपेक्षा थांबवून त्यांच्या मातापित्यांना नियमानुसार देय असलेली जमीन तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार जयंत जाधव यांनी ५ एप्रिल २०१३ मध्ये विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली होती़ यानंतर त्यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये मुख्यमंत्री व आॅक्टोबर २०१३ मध्ये विधान परिषदेच्या सभापतींना यावरील कार्यवाहीबाबत विचारणा केली होती़ विधान मंडळाच्या सचिवांनी अध्यक्षांच्या सूचनेनुसार राज्याच्या मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे पत्र देण्यात आले होते़ परंतु अद्यापपर्यंत याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे वास्तव आहे़ (प्रतिनिधी)