शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:43 IST

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो. दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे

ठळक मुद्दे भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो.दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे याचीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लोहोणेर येथील वाळू तस्कर भैय्या निकम याला अटक झाली नंतर लोहोणेर येथील वाळू चोरीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र त्या नंतर अनेक वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. तर काही महाभाग भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात काहींनी बाहेरगावाहून ट्रॅक्टर आणून वाळू उपसा सुरू केला आहे.वाळू उपसा मुळे भरमसाट पैसा मिळत असल्याने ह्या धंद्याकडे तरु ण पिढीचा कल दिवसेंदिवस वाढतच असून याला कोणीही थांबवू शकत नाही. इतर ठिकाणी वाळू तस्करावर किंवा वाळू चोरीला अटकाव केल्याचे सांगितले जाते मग गिरणा नदी पात्रातून होणार्या वाळू चोरीवर का कारवाई केली जात नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जरी काही प्रमाणात सदर कारवाई झाली तरी सदरचे वाळू चोरी करणारे वाहन कोणाच्या तरी मेहरबानीने संबधित यंत्रणा अथवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोडले जात असते ही वस्तुस्थिती आहे.मग ही वाळू चोरी थांबेल कशी हा संशोधनाचा विषय असला तरी पाणी टंचाई निर्माण झाली म्हणजे सर्वच बोबा मारतात मग रात्रीच्या वेळी बेसुमार पणे होणार्या वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्रात मोठमोठी खड्डे पडल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे.याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे कोणासही सोयरसुतक नाही हेच यामुळे स्पस्ट होत असले तरी या बेसुमार वाळू उपशा मुळे गिरणा पात्र विद्रुप व उजाड होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. यास हीच बाब जबाबदार आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे.