शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:43 IST

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो. दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे

ठळक मुद्दे भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो.दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे याचीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लोहोणेर येथील वाळू तस्कर भैय्या निकम याला अटक झाली नंतर लोहोणेर येथील वाळू चोरीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र त्या नंतर अनेक वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. तर काही महाभाग भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात काहींनी बाहेरगावाहून ट्रॅक्टर आणून वाळू उपसा सुरू केला आहे.वाळू उपसा मुळे भरमसाट पैसा मिळत असल्याने ह्या धंद्याकडे तरु ण पिढीचा कल दिवसेंदिवस वाढतच असून याला कोणीही थांबवू शकत नाही. इतर ठिकाणी वाळू तस्करावर किंवा वाळू चोरीला अटकाव केल्याचे सांगितले जाते मग गिरणा नदी पात्रातून होणार्या वाळू चोरीवर का कारवाई केली जात नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जरी काही प्रमाणात सदर कारवाई झाली तरी सदरचे वाळू चोरी करणारे वाहन कोणाच्या तरी मेहरबानीने संबधित यंत्रणा अथवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोडले जात असते ही वस्तुस्थिती आहे.मग ही वाळू चोरी थांबेल कशी हा संशोधनाचा विषय असला तरी पाणी टंचाई निर्माण झाली म्हणजे सर्वच बोबा मारतात मग रात्रीच्या वेळी बेसुमार पणे होणार्या वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्रात मोठमोठी खड्डे पडल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे.याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे कोणासही सोयरसुतक नाही हेच यामुळे स्पस्ट होत असले तरी या बेसुमार वाळू उपशा मुळे गिरणा पात्र विद्रुप व उजाड होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. यास हीच बाब जबाबदार आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे.