शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:43 IST

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो. दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे

ठळक मुद्दे भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात

लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो.दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे याचीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लोहोणेर येथील वाळू तस्कर भैय्या निकम याला अटक झाली नंतर लोहोणेर येथील वाळू चोरीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र त्या नंतर अनेक वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. तर काही महाभाग भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात काहींनी बाहेरगावाहून ट्रॅक्टर आणून वाळू उपसा सुरू केला आहे.वाळू उपसा मुळे भरमसाट पैसा मिळत असल्याने ह्या धंद्याकडे तरु ण पिढीचा कल दिवसेंदिवस वाढतच असून याला कोणीही थांबवू शकत नाही. इतर ठिकाणी वाळू तस्करावर किंवा वाळू चोरीला अटकाव केल्याचे सांगितले जाते मग गिरणा नदी पात्रातून होणार्या वाळू चोरीवर का कारवाई केली जात नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जरी काही प्रमाणात सदर कारवाई झाली तरी सदरचे वाळू चोरी करणारे वाहन कोणाच्या तरी मेहरबानीने संबधित यंत्रणा अथवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोडले जात असते ही वस्तुस्थिती आहे.मग ही वाळू चोरी थांबेल कशी हा संशोधनाचा विषय असला तरी पाणी टंचाई निर्माण झाली म्हणजे सर्वच बोबा मारतात मग रात्रीच्या वेळी बेसुमार पणे होणार्या वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्रात मोठमोठी खड्डे पडल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे.याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे कोणासही सोयरसुतक नाही हेच यामुळे स्पस्ट होत असले तरी या बेसुमार वाळू उपशा मुळे गिरणा पात्र विद्रुप व उजाड होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. यास हीच बाब जबाबदार आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे.