शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पालिकेचे दुर्लक्ष : सफाई कामगारांचे नियोजन नसल्याने फटका कचºयाचे ढीग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:15 IST

नाशिक : आरोग्य विभागाने सफाई कामगारांच्या केलेल्या बदल्या आणि पहाटे बंधनकारक केलेली सेल्फी हजेरी यामुळे सफाई कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देनियोजन न केल्याने साफसफाईची समस्या निर्माण बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची मागणी

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई कामगारांच्या केलेल्या बदल्या आणि पहाटे पाच वाजता हजेरीशेडवर बंधनकारक केलेली सेल्फी हजेरी यामुळे सफाई कामगारांमध्ये असंतोष पसरला असून, त्याचा प्रत्यय शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाच्या ढिगांच्या माध्यमातून दिसून येत आहे. सफाई कामगारांच्या बदल्या करताना नियोजन न केल्याने साफसफाईची समस्या निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, आरोग्य विभागाने ४७८ सफाई कामगारांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिक पूर्व, पश्चिम आणि नाशिकरोड विभागातील सफाई कामगारांच्या बदल्या सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदल्या गैरसोयीच्या असल्याचा आरोप सफाई कामगारांच्या संघटनांनी केला आहे तर नियोजन करून बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. त्यातच, आयुक्तांच्याच आदेशान्वये हजेरी शेडवर प्रत्येक सफाई कामगाराला सेल्फी हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्याबाबतही सफाई कामगारांमध्ये रोष आहे. सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असतानाच शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई न झाल्याने कचरा आहे तेथेच पडून आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, तक्रारींचीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.