शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सणानिमित्तचा उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर सावधानताही गरजेची दीपज्योतीचा प्रकाश भयाची काजळी दूर करो!

By किरण अग्रवाल | Updated: November 15, 2020 01:06 IST

यंदाच्या दिवाळीला कोरोनाच्या महामारीचा पदर लाभून गेला आहे खरा; पण त्याची भीती अगर दडपण न बाळगता प्रकाशपर्व साजरे होताना दिसत आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने काहीसे हायसे वातावरण आहे, शिवाय किती दिवस हातावर हात बांधून घरात बसून राहणार म्हणूनही जनजीवन पूर्वपदावर आले आहे. गेल्या आठवडाभरात तर बाजारपेठा अक्षरश: ओसंडून वाहिलेल्या दिसल्या. सर्वत्रच उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण आहे.

सारांश

किरण अग्रवालकोरोनामुळे गेल्या सहा-सात महिन्यांत अर्थकारण डळमळीत झाले होते; परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार असा फुलला की काहींचा गेल्या वर्षभरात जेवढा व्यवसाय झाला नव्हता त्यापेक्षा अधिक या आठवडा, पंधरा दिवसांत घडून आल्याचे दिसून आले. वाहन विक्री असो, की सुवर्ण खरेदी; तेथेही गर्दी आणि रांगा लागलेल्या दिसत आहेत. संकटावर मात करून आशा, उत्साहाचे दीप चहूकडे उजळले आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दिवाळी साजरी करताना नेहमीप्रमाणे उत्साह ओसंडून वाहत असला तरी सद्य:स्थितीतील कोरोनाच्या संकटाचे भान बाळगत नागरिकांनी व विशेषत: घरातील लहानग्यांनी फटाक्यांपासून दूर राहणे पसंत केल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. फटाक्याच्या धुराने होणारे वायुप्रदूषण व त्याचा कोरोनाबाधितांना श्वसनासाठी होणारा त्रास लक्षात घेता यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याला खूपच चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येत आहे. यामुळे व्यावसायिकदृष्ट्या या व्यापारात गुंतवणूक करून बसलेल्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हेही खरे, परंतु जिवाच्या आकांतापुढे आर्थिक नुकसान थिटेच ठरावे हे त्याहून खरे. तेव्हा यंदाची फटाकेमुक्त दिवाळी ही जनतेच्या सामाजिक भानाचे व जागृत अवस्थेचे निदर्शक म्हणावयास हवी. हरित लवादाच्या निर्देशाप्रमाणे फटाकेबंदी असली तरी, जनतेनेही स्वयंस्फूर्तीने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगी आहे.अर्थात दिवाळी आनंदात जात असली तरी यापुढील संभाव्य संकटे लक्षात घेता गाफील राहून चालणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये जी गर्दी उसळून आलेली दिसली त्यात फिजिकल डिस्टन्स तितकेसे पाळले गेले नाही. अनेकांकडून मास्कचा वापरदेखील केला जाताना दिसत नाही. तेव्हा अशा प्रकारची बेफिकिरी टाळणे गरजेचे आहे. फटाकेमुक्ती जशी मनावर घेतली गेली त्याच पद्धतीने कोरोनापासून बचावण्यासाठीच्या निर्देशित उपाययोजनांबाबत गांभीर्य बाळगले जाणे अपेक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना व वाहतूक व्यवस्थेत तर अधिक काळजी घ्यायला हवी. दिवाळीनिमित्त कुटुंबा-कुटुंबात व समूहा-समूहात भेटीगाठी घेऊन आनंद वाटून घेण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता यंदा या भेटीगाठीदेखील टाळायला हव्यात. संपर्क व शुभेच्छांसाठी सोशल मीडियासारखी आधुनिक माध्यमे हाती आली आहेतच, तेव्हा यंदा त्याद्वारेच व्हर्च्युअल शुभेच्छांच्या आदान-प्रदानावर समाधान मानायला हवे. दिवाळीनंतर बाजारात येणारी काहीशी निवांतता लक्षात घेता बरीच मंडळी हल्ली पर्यटनासाठी बाहेर पडतात, तेव्हा त्याही बाबतीत यंदाची स्थिती बघता काळजी घ्यायला हवी.सारांशात, दिवाळीच्या निमित्ताने अर्थचक्र सुरळीत झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडून हे चक्र फिरले आहे. तेव्हा बाजारातला उत्साह टिकवून ठेवायचा असेल तर कोरोनासंबंधातील सावधानताही बाळगली जाणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्यासाठी वास्तविकतेच्या अनुषंगाने प्रथांना व भावनांना आवर घालणे हेच सुरक्षेचे तसेच शहाणपणाचे ठरणार आहे. सध्या थंडीचा कडाका अनुभवास येत असून, आणखी काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती संसर्गाला पोषक असल्याने यासंबंधीचे भय वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे.इच्छाशक्ती प्रबळ असली की संकटांवर किंवा अडचणींवर मात करून पुढे जाता येते. सण व उत्सवातील उत्साह तर कशानेही रोखला जात नाही, त्यामुळेच कोरोनातून निर्माण झालेली भयग्रस्तता दूर सारून दिवाळी साजरी होताना दिसते आहे; पण असे असले तरी सावधानतेचे भान सुटता कामा नये. दिवाळीतील गोडाधोडाचा गोडवा व प्रकाशपर्वाची ऊर्जा अक्षय राखायची असेल तर ‘दो गज दुरी, मास्क है जरुरी’ विसरता येऊ नये. 

 

टॅग्स :Divaliदिवाळी