शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पिकवा म्हणायचं अन् पिकवलं तर खाऊ द्यायचं नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

कोट- राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात ...

कोट-

राज्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. आपल्याकडे आहे तेच उत्पादन जास्त होणार असताना केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्याने देशात सोयाबीनबरोबरच डाळींचे दरही कोसळतील. - संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना. (फोटो १४ संदीप जगताप)

कोट-

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले तरच देशातील शेतकरी वाचू शकणार आहे. आज कोथिंबीर, टमाट्यासारखी पिके फेकून देण्याची वेळ आली असताना सरकार कोणतेही वैचारिक धोरण राबवित नाही याचे वाईट वाटते - राजू देसले, किसान सभा (फोटो १४ राजु देसले)

कोट-

देशात डाळवर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही आयातीचा निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अप्रत्यक्षरीत्या मोठे नुकसान होणार आहे. देशातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. यामुळे डाळवर्गीय पिकांचे भाव कोसळतील. - हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटना. (फोटो १४ हंसराज वडघुले)

कोट-

केंद्रात कोणतेही सरकार असो ते कधीच शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत. याचा वारंवार प्रत्यय आला आहे. सोयाबीन आणि इतर डाळींच्या आयातीमुळे देशातील पिकांचे दर कोसळतील याचा शेतकऱ्यांना माेठा फटका बसणार आहे. अप्रत्यक्षपणे सरकार देशातील पिकांचे भाव पाडण्याचेच काम करत आहे.

- अर्जुन बोराडे, शेतकरी संघटना (फोटो १४ अर्जुन बोराडे)