शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार?

By admin | Updated: October 25, 2015 22:58 IST

गंगापूर धरणात ७० टक्के पाणी : नाशकात पाणीकपात; पर्यायी विचार करण्याची मागणी

नाशिक : गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर गंगापूर धरणातील पाणीसाठा आॅक्टोबरअखेर ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत राहिलेला आहे. यंदा लहरी पावसामुळे गंगापूर धरण ७० टक्केच भरू शकले आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात एकदाही गोदावरी दुथडी भरून वाहिल्याची आणि दुतोंड्या मारुती कमरेच्या वर बुडाल्याचे नाशिककरांनी पाहिलेले नाही. धरणातील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेत नाशिक महापालिकेने भविष्यातील पाणीसंकटाच्या हाका सावधपणे ऐकल्या आणि ९ आॅक्टोबरपासून शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशा स्थितीत गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचे आदेश काढले गेल्याने ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार’ अशी सार्वत्रिक भावना नाशिककरांमध्ये आहे. गंगापूर धरणाच्या माथ्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये किती पाऊस झाला, यावर धरणातील पाण्याच्या पातळीचा अंदाज नाशिककर काढत आले आहेत. गेल्या पाच-सात वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे जून-जुलै महिना बव्हंशी कोरडा जातो आणि आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत पाऊसमान समाधानकारक राहत धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या आसपास जाऊन पोहोचतो. धरण कधीही १०० टक्के भरू दिले जात नाही. त्यामुळे ९० ते ९३ टक्क्यांच्या आसपास धरणातील पाण्याची पातळी जाऊन पोहोचली की विसर्ग केलाच जातो. याच विसर्गाचा (नियोजित आवर्तनाशिवाय) आजवर मराठवाड्याला अनेकदा लाभ झालेला आहे. २०१२ मध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची मागणी झाली होती आणि २०१३ मध्ये नगर आणि नाशिकमधून १०.५३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यावेळी धरणातून ५ हजार क्यूसेक प्रतितास वेगाने विसर्ग करूनही जायकवाडी धरणापर्यंत ४० टक्के पाणी झिरपले आणि ६.५२ टीएमसी पाणीच जायकवाडीला जाऊन पोहोचू शकले होते. २०१४ मध्ये परतीच्या पावसानंतरही बेमोसमीपावसाने जिल्ह्याची पाठ पार मार्च २०१५ पर्यंत सोडलेली नव्हती.