शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार?

By admin | Updated: October 25, 2015 22:58 IST

गंगापूर धरणात ७० टक्के पाणी : नाशकात पाणीकपात; पर्यायी विचार करण्याची मागणी

नाशिक : गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर गंगापूर धरणातील पाणीसाठा आॅक्टोबरअखेर ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत राहिलेला आहे. यंदा लहरी पावसामुळे गंगापूर धरण ७० टक्केच भरू शकले आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात एकदाही गोदावरी दुथडी भरून वाहिल्याची आणि दुतोंड्या मारुती कमरेच्या वर बुडाल्याचे नाशिककरांनी पाहिलेले नाही. धरणातील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेत नाशिक महापालिकेने भविष्यातील पाणीसंकटाच्या हाका सावधपणे ऐकल्या आणि ९ आॅक्टोबरपासून शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशा स्थितीत गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचे आदेश काढले गेल्याने ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार’ अशी सार्वत्रिक भावना नाशिककरांमध्ये आहे. गंगापूर धरणाच्या माथ्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये किती पाऊस झाला, यावर धरणातील पाण्याच्या पातळीचा अंदाज नाशिककर काढत आले आहेत. गेल्या पाच-सात वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे जून-जुलै महिना बव्हंशी कोरडा जातो आणि आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत पाऊसमान समाधानकारक राहत धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या आसपास जाऊन पोहोचतो. धरण कधीही १०० टक्के भरू दिले जात नाही. त्यामुळे ९० ते ९३ टक्क्यांच्या आसपास धरणातील पाण्याची पातळी जाऊन पोहोचली की विसर्ग केलाच जातो. याच विसर्गाचा (नियोजित आवर्तनाशिवाय) आजवर मराठवाड्याला अनेकदा लाभ झालेला आहे. २०१२ मध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची मागणी झाली होती आणि २०१३ मध्ये नगर आणि नाशिकमधून १०.५३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यावेळी धरणातून ५ हजार क्यूसेक प्रतितास वेगाने विसर्ग करूनही जायकवाडी धरणापर्यंत ४० टक्के पाणी झिरपले आणि ६.५२ टीएमसी पाणीच जायकवाडीला जाऊन पोहोचू शकले होते. २०१४ मध्ये परतीच्या पावसानंतरही बेमोसमीपावसाने जिल्ह्याची पाठ पार मार्च २०१५ पर्यंत सोडलेली नव्हती.