शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....

By admin | Updated: December 7, 2014 01:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....

नाशिक : तसे म्हटले तर कार्यालय हाकेच्या अंतरावर... येताना नाही तरी जाताना मात्र नक्कीच प्रवेशद्वारावरून पुढे मार्गस्थ होण्याशिवाय पर्यायच नसतो. तीच..तीच..गर्दी, लहान मुले-बाळांना कडेवर घेत हातात सेतूच्या चिठ्ठ्या...दलालांचा कार्यालयाला पडलेला गराडा....दिवसभर वाट पाहूनही सायंकाळी शिधापत्रिका हाती न मिळाल्याने संतापाचा झालेला कडेलोट व कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उद्धट व अरेरावीच्या वागणुकीवरून नियमित होणारी खडाजंगी असे कायमचे चित्र असलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या भोवती शनिवारी कोणी फिरकलेच नाही. त्यामुळे वादावादी नाही की, कार्यालयाला जत्रेचे स्वरूप नाही. जणू काही नेहमी गजबजलेले कार्यालय अन्यत्र स्थलांतर झाले असे मनोमन वाटावे अशी परिस्थिती; परंतु हे काय एकाएकी झालेले नाही. एरव्ही जिल्हाधिकारी या कार्यालयाच्या मार्गावरून अनेक वेळा मार्गस्थ झाले, तेव्हा कधी इतकी खबरदारी कधी घेतली गेली नाही, ती शनिवारी प्रत्यक्षात अवतरल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा.....गेल्या महिन्यांपासून सातत्याने वादात सापडलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधी, सामान्य जनता व प्रसिद्धीमाध्यमाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला. महिनोन्महिने शिधापत्रिका न मिळणे, कागदपत्रे हरविल्याची सबब पुढे करणे, उद्धट व अरेरावीची वागणूक देणे, एजंट, मध्यस्थांच्या कामांना प्राधान्य देणे अशा एक नव्हे, तर अनेक तक्रारी सातत्याने होत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागवावा लागला. तरीही परिस्थितीत फरक पडला नाही, मात्र जिल्हाधिकारी शनिवारी धान्य वितरण कार्यालयाला भेट देणार अशा नुसत्या वार्तेने सारे वातावरणच पालटले. एरव्ही कार्यालयात चलन भरून घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अवतीभोवती कोंडाळे करून उभ्या राहणाऱ्या रेशन दुकानदारांना नुसते पिटाळून लावलेच नाही, तर त्यांचे चलनाचे (व त्याखालून दिले-घेतले जाणारे) कागददेखील हातात घेण्यास नकार देण्यात आला. एजंट, दलाल कार्यालयाच्या आवारात फिरकणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच, एखाद्या व्यक्तीच्या हातात स्वत:चीच पावती असेल याची खात्री करून घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात कोणी तक्रारदार येणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त करण्यासाठी काही व्यक्तींना तर थेट ‘आज कार्यालय बंद’ असा निरोप देऊन पाठवणी करण्यात आली. दिवसभर कार्यालयात शुकशुकाट तसाच तो कार्यालयाच्या आवारातही अगदीच शांतता...सायंकाळी सहा वाजेपर्यंत.....पण जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलीच नाही !