शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....

By admin | Updated: December 7, 2014 01:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा....

नाशिक : तसे म्हटले तर कार्यालय हाकेच्या अंतरावर... येताना नाही तरी जाताना मात्र नक्कीच प्रवेशद्वारावरून पुढे मार्गस्थ होण्याशिवाय पर्यायच नसतो. तीच..तीच..गर्दी, लहान मुले-बाळांना कडेवर घेत हातात सेतूच्या चिठ्ठ्या...दलालांचा कार्यालयाला पडलेला गराडा....दिवसभर वाट पाहूनही सायंकाळी शिधापत्रिका हाती न मिळाल्याने संतापाचा झालेला कडेलोट व कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या उद्धट व अरेरावीच्या वागणुकीवरून नियमित होणारी खडाजंगी असे कायमचे चित्र असलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या भोवती शनिवारी कोणी फिरकलेच नाही. त्यामुळे वादावादी नाही की, कार्यालयाला जत्रेचे स्वरूप नाही. जणू काही नेहमी गजबजलेले कार्यालय अन्यत्र स्थलांतर झाले असे मनोमन वाटावे अशी परिस्थिती; परंतु हे काय एकाएकी झालेले नाही. एरव्ही जिल्हाधिकारी या कार्यालयाच्या मार्गावरून अनेक वेळा मार्गस्थ झाले, तेव्हा कधी इतकी खबरदारी कधी घेतली गेली नाही, ती शनिवारी प्रत्यक्षात अवतरल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. जिल्हाधिकाऱ्यांचा धाक असावा तर असा.....गेल्या महिन्यांपासून सातत्याने वादात सापडलेल्या शहर धान्य वितरण कार्यालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधी, सामान्य जनता व प्रसिद्धीमाध्यमाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला. महिनोन्महिने शिधापत्रिका न मिळणे, कागदपत्रे हरविल्याची सबब पुढे करणे, उद्धट व अरेरावीची वागणूक देणे, एजंट, मध्यस्थांच्या कामांना प्राधान्य देणे अशा एक नव्हे, तर अनेक तक्रारी सातत्याने होत असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शहर धान्य वितरण अधिकाऱ्यांना नोटीस देऊन खुलासा मागवावा लागला. तरीही परिस्थितीत फरक पडला नाही, मात्र जिल्हाधिकारी शनिवारी धान्य वितरण कार्यालयाला भेट देणार अशा नुसत्या वार्तेने सारे वातावरणच पालटले. एरव्ही कार्यालयात चलन भरून घेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अवतीभोवती कोंडाळे करून उभ्या राहणाऱ्या रेशन दुकानदारांना नुसते पिटाळून लावलेच नाही, तर त्यांचे चलनाचे (व त्याखालून दिले-घेतले जाणारे) कागददेखील हातात घेण्यास नकार देण्यात आला. एजंट, दलाल कार्यालयाच्या आवारात फिरकणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच, एखाद्या व्यक्तीच्या हातात स्वत:चीच पावती असेल याची खात्री करून घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात कोणी तक्रारदार येणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त करण्यासाठी काही व्यक्तींना तर थेट ‘आज कार्यालय बंद’ असा निरोप देऊन पाठवणी करण्यात आली. दिवसभर कार्यालयात शुकशुकाट तसाच तो कार्यालयाच्या आवारातही अगदीच शांतता...सायंकाळी सहा वाजेपर्यंत.....पण जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलीच नाही !