शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानात समाजघटकांनी सातत्य राखल्यास सदैव ‘सरप्लस’ साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम ...

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम राबविल्यास महाराष्ट्राला कधीही रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. किंबहुना नियोजनबद्धपणे रक्तदान ड्राइव्ह चालवल्यास सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देणारे नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने २ जुलैपासून राज्यभरात रक्तदान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी लोकमतशी मनमोकळा संवाद साधत या मोहिमेत सहभागी करून समाजसेवेची संधी दिल्याबाबत आभारदेखील मानले.

प्र. रक्तदानाच्या चळवळीबाबत आपण सदैव आग्रही भूमिका घेता, त्यामागे काय कारण आहे ?

दीपक चंदे : रक्तदान हे महादान, रक्तदान म्हणजे जीवनदान हे आपणा सर्वांना माहिती आहे. तसेच रक्त हे जगातील कोणत्याही कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त तर नक्कीच द्यावे. त्याचबरोबर रक्तदात्यालाही रक्तदानामुळे शारीरिकदृष्ट्या खूप फायदा होत असतो.

प्र. रक्तदात्यांचा नक्की कशा प्रकारे फायदा होतो, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे - रक्तदात्याने ४५० मिली रक्तदान केल्याने आपल्या शरीरास सुमारे ६५० कॅलरी जळण्यास मदत करते. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्यांची वजनवाढदेखील नियंत्रणात राहते. तसेच नियमित रक्तदान केल्याने शरीरातील आयर्नची पातळी कमी होण्यास मदत होत असल्याने हृदयरोगाचा, कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच नवीन दमाच्या लाल रक्तपेशी पुन्हा तयार होऊन रक्तदाता अधिक तंदुरुस्त राहू शकतो, इतके फायदे रक्तदात्यालाही होत असल्याने स्वेच्छेने रक्तदान करावे.

प्र. रक्तदान करण्यामागे रक्तदात्याची नक्की काय भूमिका असावी ?

दीपक चंदे : रक्ताचे विविध प्रकारचे आजार, अपघातानंतरचा रक्तस्त्राव, प्रसूतिपश्चात रक्तस्त्राव, विविध शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रक्त तातडीने उपलब्ध झाले तरच रुग्ण वाचू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने आपण दिलेल्या रक्ताने कुणाचा तरी जीव वाचणार आहे, आपल्या सुदैवाने कुणाला तरी आपण जीवनदान देऊ शकणार असल्याची समाधानाची भावना मनात ठेवून रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.

प्र. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे : राज्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधील युवक तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांतील सर्व तंदुरुस्त व्यक्तींनी नियोजनबद्धपणे वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्यास राज्यात कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. त्याबदल्यात संबंधित शिक्षण संस्थांतील कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय विभाग, खासगी कार्यालये यांना काही प्रोत्साहनपर गुण किंवा सन्मानपत्र, रक्तदात्यांना एक दिवसाची सुटी दिल्यास राज्यात सदैव सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास वाटतो.

--------------

फोटो

२७ चंदे दीपक

लोगो

लोकमत रक्ताचं नातं हा लोगो अत्यावश्यक.

------------------------