शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानात समाजघटकांनी सातत्य राखल्यास सदैव ‘सरप्लस’ साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम ...

नाशिक : रक्तदानाच्या प्रक्रियेत सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, शासकीय आणि खासगी कार्यालयांनी दरवर्षी पुढाकार घेऊन रक्तदानाची मोहीम राबविल्यास महाराष्ट्राला कधीही रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. किंबहुना नियोजनबद्धपणे रक्तदान ड्राइव्ह चालवल्यास सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देणारे नाशिकचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने २ जुलैपासून राज्यभरात रक्तदान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेच्या निमित्ताने त्यांनी लोकमतशी मनमोकळा संवाद साधत या मोहिमेत सहभागी करून समाजसेवेची संधी दिल्याबाबत आभारदेखील मानले.

प्र. रक्तदानाच्या चळवळीबाबत आपण सदैव आग्रही भूमिका घेता, त्यामागे काय कारण आहे ?

दीपक चंदे : रक्तदान हे महादान, रक्तदान म्हणजे जीवनदान हे आपणा सर्वांना माहिती आहे. तसेच रक्त हे जगातील कोणत्याही कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त तर नक्कीच द्यावे. त्याचबरोबर रक्तदात्यालाही रक्तदानामुळे शारीरिकदृष्ट्या खूप फायदा होत असतो.

प्र. रक्तदात्यांचा नक्की कशा प्रकारे फायदा होतो, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे - रक्तदात्याने ४५० मिली रक्तदान केल्याने आपल्या शरीरास सुमारे ६५० कॅलरी जळण्यास मदत करते. त्यामुळे नियमित रक्तदान करणाऱ्यांची वजनवाढदेखील नियंत्रणात राहते. तसेच नियमित रक्तदान केल्याने शरीरातील आयर्नची पातळी कमी होण्यास मदत होत असल्याने हृदयरोगाचा, कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच नवीन दमाच्या लाल रक्तपेशी पुन्हा तयार होऊन रक्तदाता अधिक तंदुरुस्त राहू शकतो, इतके फायदे रक्तदात्यालाही होत असल्याने स्वेच्छेने रक्तदान करावे.

प्र. रक्तदान करण्यामागे रक्तदात्याची नक्की काय भूमिका असावी ?

दीपक चंदे : रक्ताचे विविध प्रकारचे आजार, अपघातानंतरचा रक्तस्त्राव, प्रसूतिपश्चात रक्तस्त्राव, विविध शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रक्त तातडीने उपलब्ध झाले तरच रुग्ण वाचू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने आपण दिलेल्या रक्ताने कुणाचा तरी जीव वाचणार आहे, आपल्या सुदैवाने कुणाला तरी आपण जीवनदान देऊ शकणार असल्याची समाधानाची भावना मनात ठेवून रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.

प्र. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटते ?

दीपक चंदे : राज्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधील युवक तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांतील सर्व तंदुरुस्त व्यक्तींनी नियोजनबद्धपणे वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्यास राज्यात कधीच रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. त्याबदल्यात संबंधित शिक्षण संस्थांतील कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय विभाग, खासगी कार्यालये यांना काही प्रोत्साहनपर गुण किंवा सन्मानपत्र, रक्तदात्यांना एक दिवसाची सुटी दिल्यास राज्यात सदैव सरप्लस रक्तसाठा राहून महाराष्ट्र संपूर्ण देशाला रक्तपुरवठा करू शकेल, असा विश्वास वाटतो.

--------------

फोटो

२७ चंदे दीपक

लोगो

लोकमत रक्ताचं नातं हा लोगो अत्यावश्यक.

------------------------