शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सरकारने दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

पंचवटी : राज्य सरकारने येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांबाबत तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ...

पंचवटी : राज्य सरकारने येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांबाबत तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

टमाटा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने मालाचे बाजारभाव कोसळले आहेत. बाजारभाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल टमाटा माल जनावरांसाठी सोडून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गुरुवारी दुपारी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार बाजार समितीत टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राज्य शासनाने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांना टमाटा मालासह अन्य भाजीपाल्याला किमान किलोमागे दहा रुपये अनुदान द्यावे तसे नसेल तर शेतीचे पंचनामे करावे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीक असेल त्यांना एक लाख रुपये अनुदान दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा अंत पाहण्यापेक्षा त्यांना मदत कशी करता येईल यासाठी सरकारने पुढे यायला पाहिजे. शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवणाऱ्या बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.