शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून वैचारिक दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:36 IST

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेसकडून जागरसरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विखे-पाटील पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारच्या कामकाजाबाबत समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, उलट सरकारने आपली फसवणूक केली, अशी भावना प्रत्येक घटकात झाली आहे. कॉँग्रेसने देशपातळीवर इंधन दरवाढीचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याचा विचार करता ज्यावेळी सरकार सत्तेवर आले त्यावेळी १५० डॉलर प्रति बॅरल असलेले दर २९ डॉलरवर आले होते. त्यामुळे जनतेला ४० ते ५० रुपये दराने इंधन मिळणे अपेक्षित होते, परंतु सरकारने चढ्या दरानेच इंधनाची विक्री करून जनतेला महागाईच्या खाईत लोटले. अशा परिस्थितीत आवाज उठवू पाहणाºया समाज घटकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारच्या विरोधात बातम्या देणाºयांना ‘फेक न्यूज’ संबोधून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु देशपातळीवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने हा कायदा तत्काळ मागे घेतला. राज्यातदेखील असाच प्रकार करण्यात आला. अंगणवाडी सेविका संपावर गेल्यावर त्यांना ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉँग्रेसने या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या साºया गोष्टी पाहता सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करीत असून, ज्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध कायद्याचा आधार घेत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या अनेक घटना घडत असून, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यादेखील त्याचाच एक भाग आहे. सरकार पाठीराख्या असलेल्या सनातनसारख्या संघटनांचा अशा घटनांमध्ये सहभाग आढळून आला आहे. कॉँग्रेसने नेमक्या याच गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतल्याचेही विखे म्हणाले.नगर जिल्हा गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले. गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले.