शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सरकारकडून वैचारिक दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:36 IST

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेसकडून जागरसरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विखे-पाटील पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारच्या कामकाजाबाबत समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, उलट सरकारने आपली फसवणूक केली, अशी भावना प्रत्येक घटकात झाली आहे. कॉँग्रेसने देशपातळीवर इंधन दरवाढीचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याचा विचार करता ज्यावेळी सरकार सत्तेवर आले त्यावेळी १५० डॉलर प्रति बॅरल असलेले दर २९ डॉलरवर आले होते. त्यामुळे जनतेला ४० ते ५० रुपये दराने इंधन मिळणे अपेक्षित होते, परंतु सरकारने चढ्या दरानेच इंधनाची विक्री करून जनतेला महागाईच्या खाईत लोटले. अशा परिस्थितीत आवाज उठवू पाहणाºया समाज घटकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारच्या विरोधात बातम्या देणाºयांना ‘फेक न्यूज’ संबोधून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु देशपातळीवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने हा कायदा तत्काळ मागे घेतला. राज्यातदेखील असाच प्रकार करण्यात आला. अंगणवाडी सेविका संपावर गेल्यावर त्यांना ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉँग्रेसने या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या साºया गोष्टी पाहता सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करीत असून, ज्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध कायद्याचा आधार घेत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या अनेक घटना घडत असून, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यादेखील त्याचाच एक भाग आहे. सरकार पाठीराख्या असलेल्या सनातनसारख्या संघटनांचा अशा घटनांमध्ये सहभाग आढळून आला आहे. कॉँग्रेसने नेमक्या याच गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतल्याचेही विखे म्हणाले.नगर जिल्हा गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले. गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले.