शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून वैचारिक दहशतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:36 IST

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील : कॉँग्रेसकडून जागरसरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न

नाशिक : सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याचा तर मागण्यांसाठी संपावर जाणाºया अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्याची भूमिका घेऊन देशपातळीवर सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. नाशिक येथे कॉँग्रेसच्या उपवास आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.विखे-पाटील पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारच्या कामकाजाबाबत समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, उलट सरकारने आपली फसवणूक केली, अशी भावना प्रत्येक घटकात झाली आहे. कॉँग्रेसने देशपातळीवर इंधन दरवाढीचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याचा विचार करता ज्यावेळी सरकार सत्तेवर आले त्यावेळी १५० डॉलर प्रति बॅरल असलेले दर २९ डॉलरवर आले होते. त्यामुळे जनतेला ४० ते ५० रुपये दराने इंधन मिळणे अपेक्षित होते, परंतु सरकारने चढ्या दरानेच इंधनाची विक्री करून जनतेला महागाईच्या खाईत लोटले. अशा परिस्थितीत आवाज उठवू पाहणाºया समाज घटकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारच्या विरोधात बातम्या देणाºयांना ‘फेक न्यूज’ संबोधून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु देशपातळीवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने हा कायदा तत्काळ मागे घेतला. राज्यातदेखील असाच प्रकार करण्यात आला. अंगणवाडी सेविका संपावर गेल्यावर त्यांना ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉँग्रेसने या विरुद्ध आवाज उठविल्यानंतर सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या साºया गोष्टी पाहता सरकार वैचारिक दहशतवाद निर्माण करीत असून, ज्यांनी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध कायद्याचा आधार घेत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या अनेक घटना घडत असून, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यादेखील त्याचाच एक भाग आहे. सरकार पाठीराख्या असलेल्या सनातनसारख्या संघटनांचा अशा घटनांमध्ये सहभाग आढळून आला आहे. कॉँग्रेसने नेमक्या याच गोष्टी जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतल्याचेही विखे म्हणाले.नगर जिल्हा गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले. गुन्हेगारीचे आगरनगर जिल्हा गुन्हेगारीचे आगर झाले असून, येथे खुलेआम शस्त्राचा वापर केला जात आहे. पोलिसांचा धाक कोठेच राहिलेला नाही. उलट सरकारच्या मर्जीने विरोधकांवर गुन्हे दाखल करून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही विखे म्हणाले.