शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:10 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : पालापाचोळा-गाजरगवताचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी

इंदिरानगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्षमित्रमंडळाची स्थापना केली. त्या काळी बापूबंगल्यासमोरील मोकळ्या जागेचा केरकचरा टाकण्यासाठीुदुरुपयोग होत असल्याने बकालस्वरूप प्राप्त झाले होते. मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सापुतारा ब्रह्मगिरी यांसारख्या विविध जंगले व डोंगरातून दुर्मीळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून त्याचे वृक्षात रूपांतर झाले. वृक्ष सावली देण्याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहेत.उद्यानाच्या प्रत्येक वृक्षालगत चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षांची माहिती लिहिण्यात आली होती. त्यामुळे आबालवृद्धांना त्याची ओळख होत असे, परंतु त्यांची ओळख होणारे चबुतरे हटवण्यात आले. त्यांची ओळख नाहीशी झाली आहे. त्यातच सदर उद्यानाची देखभालअभावी गाजरगवत व पालापाचोळामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आबालवृद्धांनी आणि वृक्षप्रेमींनी उघानाकडे पाठ फिरवली आहे. तातडीने उद्यानाची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका