शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:10 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : पालापाचोळा-गाजरगवताचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी

इंदिरानगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्षमित्रमंडळाची स्थापना केली. त्या काळी बापूबंगल्यासमोरील मोकळ्या जागेचा केरकचरा टाकण्यासाठीुदुरुपयोग होत असल्याने बकालस्वरूप प्राप्त झाले होते. मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सापुतारा ब्रह्मगिरी यांसारख्या विविध जंगले व डोंगरातून दुर्मीळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून त्याचे वृक्षात रूपांतर झाले. वृक्ष सावली देण्याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहेत.उद्यानाच्या प्रत्येक वृक्षालगत चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षांची माहिती लिहिण्यात आली होती. त्यामुळे आबालवृद्धांना त्याची ओळख होत असे, परंतु त्यांची ओळख होणारे चबुतरे हटवण्यात आले. त्यांची ओळख नाहीशी झाली आहे. त्यातच सदर उद्यानाची देखभालअभावी गाजरगवत व पालापाचोळामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आबालवृद्धांनी आणि वृक्षप्रेमींनी उघानाकडे पाठ फिरवली आहे. तातडीने उद्यानाची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका