शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

कामांची गुणवत्ता आत्ताच तपासून पाहण्याचा विचार

By admin | Updated: May 17, 2015 01:49 IST

कामांची गुणवत्ता आत्ताच तपासून पाहण्याचा विचार

नाशिक : सिंहस्थ कामांसाठी पुरेसा कालावधी देऊनही होणारा विलंब व सरते शेवटी कामे पूर्ण करताना गुणवत्तेकडे होणारे दुर्लक्ष, कामांच्या दर्जाबाबत मंत्रिपातळीवरून व्यक्त केली जाणारी वेळोवेळची नाराजी पाहता, या कामांबाबत खुद्द जिल्हाधिकारीही साशंक असल्याचे जाणवू लागले असून, भविष्यात कुंभमेळ्याच्या कामावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याऐवजी पूर्णत्वास येऊ पाहणाऱ्या कामांची गुणवत्ता आत्ताच तपासून पाहण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने सुरू आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आजवर दोन वेळा साधुग्रामला दिलेल्या भेटी दरम्यानच तपोवनात सुरू असलेल्या कामांबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही; परंतु कामाच्या गुणवत्तेविषयी तडजोड न करण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. मध्यंतरीच्या काळात विधीमंडळातही एका सदस्याने कुंभमेळ्याच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करून भविष्यातील संकटाची चाहूल दिली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना अजूनही कुंभमेळ्याची बहुतांशी कामे अपूर्ण तर काही सुरूही झालेली नाहीत. महिनाभरात कामे पूर्ण करण्याच्या नादात कामाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याचबरोबर कुंभमेळ्याच्या कामांचा निधी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन पोहोचतो व तेथून तो अन्य यंत्रणांना त्यांच्या मागणी व कामाच्या पूर्णतेवर वितरीत केला जातो. त्यामुळे शासनाच्या निधीच्या योग्य विनियोगाची जबाबदारी अप्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांवरच निश्चित होते. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या कामांची गुणवत्ता ढासळल्यास किंवा ऐन पर्वणीच्या काळातच या कामांच्या निकृष्ट दर्जामुळे दुर्घटना घडल्यास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागू नये म्हणून कामे पूर्ण होण्यापूर्वीच त्याची गुणवत्ता तटस्थ यंत्रणेमार्फत तपासून घेण्याचा विचार पुढे आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ज्या ज्या वेळी सिंहस्थ कामांच्या दर्जाबाबत चर्चा झाली त्या त्यावेळी प्रशासनाने कामे गुणवत्ता व दर्जेदार होत असल्याचे दावे केले होते. त्यानंतर मात्र कामांच्या गुणवत्तेची जबाबदारी त्या त्या यंत्रणेवर असेल असेही जाहीर केले होते. मध्यंतरीच्या काळात कामांची गुणवत्ता न राखणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. आता मात्र खुद्द प्रशासनाला सावधगिरी म्हणून मेरीमार्फत कामे तपासून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याने निश्चितच या कामांबाबत होत असलेल्या आरडा-ओरडीमध्ये तथ्य असल्याचे जाणवू लागले आहे. (प्रतिनिधी)