शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST

शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत.

गणेश धुरी।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत. काही दिवसांपूर्वीच घोटी (ता. इगतपुरी) येथे खतेविक्रीच्या परवान्याच्या जागी चक्क मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानावर तीन महिन्यांसाठी खते विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला असला तरी त्या अनुषंगाने एकूणच खतांच्या परवाने व नूतनीकरणाच्या आडून चालणारे गोरखधंदे उघड झाले. काही बोटावर मोजण्याइतक्या बदमाशी करणाºया लोकांमुळे सरसकट सर्वच खते व बियाणे विक्रेत्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. वास्तविक पाहता हे दुकाने गावातल्या गावात शेतकºयांना त्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक ती बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देत असतात. त्यासाठीच्या अटी-शर्ती पाहिल्या तर सहजपणे कोणालाही कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र अनेक दिव्यातून तावूनसुलाखून परवाना मिळविलेल्या परवानाधारकांनीही मिळालेल्या परवान्यानुसारच शासनाचे नियम-निकष पाळून कृषी निविष्ठांची विक्री केली पाहिजे. कृषी निविष्ठांसाठी असलेल्या जाचक अटींमुळे सर्व सामान्य शेतकरी अथवा एखादा पदवीधारक सुशिक्षित बेरोजगार युवकाने स्वत:चाच व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी निविष्ठा परवाना काढायचे ठरविल्यास त्यासाठी ती तारेवरची कसरत असते.  कीटकनाशके विक्रीच्या परवान्यासाठी स्वतंत्र दुकान व स्वतंत्र गुदामासाठी जागा आवश्यक असणे बंधनकारक आहे. तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना ज्याच्या नावावर घ्यायचा आहे, तो पदवी किंवा पदविकाधारक असण्याची अट आहे. म्हणजेच प्रत्येकालाच पदवी, पदविका मिळवूनच परवाना काढावा लागेल. प्रत्येकाकडेच ती जागा उपलब्ध होईल, असे नाही. सातबारा काढण्यापासून ते कृषी निविष्ठा परवाना काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. हा अडचणींचा डोंगर पार केलाच तरीही शुल्लक कारणांनी परवाना निलंबनाची टांगती तलवार कृषी निविष्ठाधारकांवर कायम असते. भरारी पथकांची पाहणी आणि तपासणीही बºयाच वेळा कृषी निविष्ठाधारकांची डोकेदुखी वाढविणारी असते. बºयाच वेळा आॅनलाइन अर्ज करूनही कृषी निविष्ठा परवाना मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात.