शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST

शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत.

गणेश धुरी।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत. काही दिवसांपूर्वीच घोटी (ता. इगतपुरी) येथे खतेविक्रीच्या परवान्याच्या जागी चक्क मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानावर तीन महिन्यांसाठी खते विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला असला तरी त्या अनुषंगाने एकूणच खतांच्या परवाने व नूतनीकरणाच्या आडून चालणारे गोरखधंदे उघड झाले. काही बोटावर मोजण्याइतक्या बदमाशी करणाºया लोकांमुळे सरसकट सर्वच खते व बियाणे विक्रेत्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. वास्तविक पाहता हे दुकाने गावातल्या गावात शेतकºयांना त्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक ती बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देत असतात. त्यासाठीच्या अटी-शर्ती पाहिल्या तर सहजपणे कोणालाही कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र अनेक दिव्यातून तावूनसुलाखून परवाना मिळविलेल्या परवानाधारकांनीही मिळालेल्या परवान्यानुसारच शासनाचे नियम-निकष पाळून कृषी निविष्ठांची विक्री केली पाहिजे. कृषी निविष्ठांसाठी असलेल्या जाचक अटींमुळे सर्व सामान्य शेतकरी अथवा एखादा पदवीधारक सुशिक्षित बेरोजगार युवकाने स्वत:चाच व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी निविष्ठा परवाना काढायचे ठरविल्यास त्यासाठी ती तारेवरची कसरत असते.  कीटकनाशके विक्रीच्या परवान्यासाठी स्वतंत्र दुकान व स्वतंत्र गुदामासाठी जागा आवश्यक असणे बंधनकारक आहे. तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना ज्याच्या नावावर घ्यायचा आहे, तो पदवी किंवा पदविकाधारक असण्याची अट आहे. म्हणजेच प्रत्येकालाच पदवी, पदविका मिळवूनच परवाना काढावा लागेल. प्रत्येकाकडेच ती जागा उपलब्ध होईल, असे नाही. सातबारा काढण्यापासून ते कृषी निविष्ठा परवाना काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. हा अडचणींचा डोंगर पार केलाच तरीही शुल्लक कारणांनी परवाना निलंबनाची टांगती तलवार कृषी निविष्ठाधारकांवर कायम असते. भरारी पथकांची पाहणी आणि तपासणीही बºयाच वेळा कृषी निविष्ठाधारकांची डोकेदुखी वाढविणारी असते. बºयाच वेळा आॅनलाइन अर्ज करूनही कृषी निविष्ठा परवाना मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात.