शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

अडीच हजार हमालांची उपासमार

By admin | Updated: June 4, 2017 02:33 IST

तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास अडीच हजाराहून अधिक हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने हमाल संप मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत

 संदीप झिरवाळ । लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी, तसेच सातबारा कोरा करावा, यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील जवळपास अडीच हजाराहून अधिक हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाल्याने हमाल संप मिटण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे बाजार समितीत हमाली करून उदरनिर्वाह करणाऱ्या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास अडीच हजाराहून अधिक हमाल हमाली व्यवसाय करतात. शेतकरी संपामुळे या हमालांवर सध्या तरी घरी बसण्याची वेळ आली आहे. संपामुळे हमाली काम नसल्याने बाजार समितीतील आडत कंपनी तसेच व्यापाऱ्यांकडून दैनंदिन मिळणारी हमाली कामाचा चारशे ते पाचशे रुपये रोजगार बुडत आहे. बाजार समितीत शेतमाल खाली करणारे, जुडी लावणारे, शेतमालाची वाहने भरणारे, शेतमालाची पॅकिंग करणारे तसेच कॅरेट वाहणाऱ्या हमालांची संख्या अडीच हजारापेक्षा जास्त आहे. हमाली व्यवसाय करणाऱ्यात तरुण, युवक तसेच महिला वर्गाचाही समावेश आहे. तीन दिवसांपासून हमाली काम नसल्याने हमालांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. हमाली व्यवसाय बंद असल्याने व कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे या व्यवसायावरच अवलंबून असणाऱ्या हमालांना रोजच्या मीठ, मिरचीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढला तर हमालांना रोजगार मिळेल, याचीच प्रतीक्षा सध्या हमाल करत आहेत.