शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेकडो जनावरे गेल्याने लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

नांदगाव : ८ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने शेकडो जनावरे वाहून गेल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नद्या-नाल्यांना ...

नांदगाव : ८ सप्टेंबर रोजी आलेल्या पुराने शेकडो जनावरे वाहून गेल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नद्या-नाल्यांना मोठे पूर आले. त्यात सुमारे १०० ते १२५ लहान मोठी पाळीव जनावरे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. बैल, गाय, म्हैस अशी १८ मोठी जनावरे, शेळ्या मेंढ्या १९ व पोल्ट्री फार्मचे ७००० पक्षी वाहून गेल्याचे पंचनामे पशुधन विभागाने केले असल्याची माहिती डॉ. नवनाथ ताठे यांनी दिली. त्यांची एकत्रित किंमत दहा लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त पुरात वाहून गेलेल्या जनावरांची संख्या १०० ते १५० च्या दरम्यान आहे. तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचनामे केले आहेत. दहेगाव, साकोरे ते न्यायडोंगरी या दरम्यान नदीकाठी असलेल्या छोट्या वस्त्या व गावे यातील पशुधन पुरात गमावले आहे.

----------------------

अफवा पसरविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नांदगाव दौऱ्यात दहेगाव धरण फुटल्याची अफवा पसरवून जनतेला वेठीस धरणाऱ्या अंकुश थोरात(३५) व काळी आव्हाड (२५) या दोघा संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे करीत आहेत.

-------------------------

जमियत उलमा ए हिंदतर्फे पूरग्रस्तांना मदत

नांदगाव : येथील जमियत उलमा ए हिंद मनमाडतर्फे शहरातील पूरग्रस्तांना मदत म्हणून टेम्पो भर ब्लँकेट,चादरी व खाण्याची पाकीट वाटप करण्यात आले. लोकांसमोर हे एक भयानक संकट निर्माण झाले आहे, या भयावह परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत जमियत उलमा ए हिंद रात्रीच्या वेळी नांदगाव शहरात दाखल होऊन रिलीफ कार्य केले. जमियत उलमा ए हिंद मनमाड टीमतर्फे नांदगाव पूरग्रस्त भागांची पाहणी करून भविष्यात पूरग्रस्त लोकांचे पुनवर्सन व्हावे यावरदेखील जमियत उलमा ए हिंद कार्य करणार असल्याचे मत मनमाडचे अध्यक्ष हाजी रफिक यांनी सांगितले. यावेळी जमियत उलमा हिंद मनमाड शहराध्यक्ष हाजी रफिक, उपाध्यक्ष फिरोज शेख,मौलाना तौसिफ,शहर सचिव कादिर शेख, जुबेर हाजी, खजिनदार कयाम सैय्यद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या मदत कार्यात हाशिम मर्चंड, व डॉ फरीद यांनी सहकार्य केले.

----------------------