शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या संगतीने मानवाची प्रगती

By admin | Updated: December 28, 2015 22:17 IST

माधवगिरी महाराज : जनार्दन स्वामी पालखी सोहळा

पंचवटी : सध्याच्या विज्ञान युगात तांत्रिक प्रगती होत आहे, मात्र मानवाची वैचारिक प्रगती होत नसल्याने जीवन भकास होत चालले आहे. इतर तंत्रज्ञानामुळे मुले संस्कारहीन होत असल्याने संतांची संगत गरजेची आहे. यामुळेच मानवाची प्रगती होऊन सुख, समाधान लाभते, असे मत संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी मांडले. हिरावाडी (शक्तीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व भजन, प्रवचन, सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे असे सांगितले की, नाशिकही पवित्र अशी भूमी आहे. संतांच्या संगतीने भक्ती आणि धर्मात वाढ होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे म्हणून संस्कृत भाषेला देवभाषा असेही संबोधतात. संस्कृत भाषा समजायला कठीण असली तरी ती आत्मसात केल्यास वाणी शुद्ध होते, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी संतोषगिरी महाराज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. सकाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्व. मीनाताई क्रीडा संकुल येथून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण हिरावाडी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर संकल्प लॉन्ड्री येथे कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीनंतर भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुचि कुंभारकर आदिंसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी संजय बुंदेले, अनिल चव्हाण, संजय भवर, दादा आमले, योगेश चव्हाण, नितीन बुंदेले, योगेश दौडे, विश्वनाथ बोडके, करण जाधव, तुषार विभांडिक, बंडू साबळे आदिंसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या परिसरातील सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. (वार्ताहर)