शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

संतांच्या संगतीने मानवाची प्रगती

By admin | Updated: December 28, 2015 22:17 IST

माधवगिरी महाराज : जनार्दन स्वामी पालखी सोहळा

पंचवटी : सध्याच्या विज्ञान युगात तांत्रिक प्रगती होत आहे, मात्र मानवाची वैचारिक प्रगती होत नसल्याने जीवन भकास होत चालले आहे. इतर तंत्रज्ञानामुळे मुले संस्कारहीन होत असल्याने संतांची संगत गरजेची आहे. यामुळेच मानवाची प्रगती होऊन सुख, समाधान लाभते, असे मत संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य माधवगिरी महाराज यांनी मांडले. हिरावाडी (शक्तीनगर) येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व भजन, प्रवचन, सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी माधवगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे असे सांगितले की, नाशिकही पवित्र अशी भूमी आहे. संतांच्या संगतीने भक्ती आणि धर्मात वाढ होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे म्हणून संस्कृत भाषेला देवभाषा असेही संबोधतात. संस्कृत भाषा समजायला कठीण असली तरी ती आत्मसात केल्यास वाणी शुद्ध होते, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी संतोषगिरी महाराज यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला. सकाळी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर संत जनार्दन स्वामी महाराजांच्या प्रतिमेची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्व. मीनाताई क्रीडा संकुल येथून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण हिरावाडी परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आल्यानंतर संकल्प लॉन्ड्री येथे कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. या पालखी मिरवणुकीनंतर भजन, प्रवचनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुचि कुंभारकर आदिंसह भाविक उपस्थित होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी संजय बुंदेले, अनिल चव्हाण, संजय भवर, दादा आमले, योगेश चव्हाण, नितीन बुंदेले, योगेश दौडे, विश्वनाथ बोडके, करण जाधव, तुषार विभांडिक, बंडू साबळे आदिंसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या परिसरातील सर्व देणगीदार, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. (वार्ताहर)