शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

२० पासून मानवी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:16 IST

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देप्रबोधन अभियानपानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी तपासात दिरंगाईचा अंनिसकडून आरोप

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.वसंतराव नाईक तंत्रशिक्षण संस्थेत अंनिसच्या वतीने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सदर माहिती दिली. यावेळी पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन संबंधीची चळवळ आणखी व्यापक करण्याची गरज आहे. कारण संभाजी भिडे यांच्यासारखे लोक आंबा खाऊन पुत्रप्राप्ती होते, असे लोकांना सांगून दिशाभूल करतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध केवळ गुन्हा दाखल करून थांबणे योग्य नाही. तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी बोगस डॉक्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारी वकील अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांची नेमणूक करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.दाभोळकर व पानसरे हत्या प्रकरणात आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीदेखील वेळोवेळी भेट घेतली तरीही तपासाला गती मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अंनिसच्या स्थापनेला तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ९ आॅगस्ट २०१८ ते २० पर्यंत वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. याप्रसंगी कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, प्रभाकर धात्रक आदींसह अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.