शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

२० पासून मानवी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 01:16 IST

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देप्रबोधन अभियानपानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी तपासात दिरंगाईचा अंनिसकडून आरोप

नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष विचारवंत प्रा. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित संघटनांबद्दल राज्य सरकारला माहिती असूनही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने तपास कामात दिरंगाई करण्यात येऊन दोषी व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात टाळटाळ करण्यात येत आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तसेच सामाजिक बहिष्कार विरोध कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात दि. २० आॅगस्ट ते २१ सप्टेंबर या काळात मानवी विकास संवाद प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.वसंतराव नाईक तंत्रशिक्षण संस्थेत अंनिसच्या वतीने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सदर माहिती दिली. यावेळी पाटील म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन संबंधीची चळवळ आणखी व्यापक करण्याची गरज आहे. कारण संभाजी भिडे यांच्यासारखे लोक आंबा खाऊन पुत्रप्राप्ती होते, असे लोकांना सांगून दिशाभूल करतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध केवळ गुन्हा दाखल करून थांबणे योग्य नाही. तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी बोगस डॉक्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारी वकील अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांची नेमणूक करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.दाभोळकर व पानसरे हत्या प्रकरणात आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचीदेखील वेळोवेळी भेट घेतली तरीही तपासाला गती मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, अंनिसच्या स्थापनेला तीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ९ आॅगस्ट २०१८ ते २० पर्यंत वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. याप्रसंगी कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, प्रभाकर धात्रक आदींसह अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.