शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

झाडांना मानवी अन् नैसर्गिक धोका

By admin | Updated: August 1, 2016 00:59 IST

सर्वेक्षण गरजेचे : निष्काळजीपणे केलेल्या छाटणीमुळे सुरक्षिततेला छेद

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात वृक्ष कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील धोकेदायक वृक्षांचे सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वृक्ष कोसळण्यामागे नैसर्गिक कारणांबरोबरच विकृत मनोवृत्तीमधून केले जाणारे कृत्यही कारणीभूत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.वकीलवाडीमध्ये दोन आठवड्यापूर्वी कडुनिंबाचे सुमारे चाळीस वर्ष जुने झाड अचानकपणे बुंध्यापासून तुटून कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र झाडे कोसळण्यामागची कारणमीमांसा महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून केली जात नाही. फांद्यांची छाटणी करून धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षाची सुरक्षितताच धोक्यात येते. याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ‘लोकमत’ने यापूर्वीच ‘अशास्त्रीय छाटणीमुळे वृक्षांचा धोका वाढतो’ याकडे लक्ष वेधले होते. जीर्ण वृक्ष तसेच वाळवी लागून कुजलेल्या बुंध्याचे वृक्ष किंवा नुसतीच ओंडक्याच्या स्वरूपात दिसणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वृक्षारोपण मोहिमेत शहराच्या अनेक भागात नवीन झाडे लावली जातात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शहरात उभी असलेल्या झाडांची मात्र काळजी घेतली जात नाही. (प्रतिनिधी)