शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता ...

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी कसरतीचे ठरणार आहे. मनासारख्या व नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी प्रवेशपात्रता निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजित केलेली सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांवरच गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यानुसारच अकरावीचे प्रवेश राबविले जाऊ शकतात. परंतु, अकरावीच्या ऑनलाइन अर्जाचा भाग-१ भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रियाही १६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक अकरावीच्या प्रवेशाविषयी चिंतित झाले असून आपल्याला जवळच्या व पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

---

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ९२२१०

अकरावीची प्रवेश क्षमता - २५,२७०

कोणत्या शाखेत किती जागा

कला -४९१०

वाणिज्य - ८६००

विज्ञान -१०१६०

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

----

आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय रद्द झाल्याने एसएससी, सीबीएसई, आसीएसईसह विविध मंडळांच्या दहावीच्या निकालानुसार गतवर्षाप्रमाणेच प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. परंतु, अद्याप अकरावी प्रवेशांविषयी राज्य सरकारचे कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

- के.आर. गीते, उपप्राचार्य केव्हीएन नाईक महाविद्यालय

विद्यार्थी चिंतेत

दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकन पद्धतीमुळे जाहीर करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने दहावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सीईटीच्या माध्यमातून पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू शकली असती. परंतु, आता चांगले टक्के असतानाही अपेक्षित महाविद्यालयातच प्रवेश मिळेल किंवा नाही, याची चिंता आहे.

- विलास जाधव, विद्यार्थी

--

सीईटी झाली असती तर नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली असती. परंतु, आता अंतर्गत मूल्यांकनात काही प्रमाणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने किमान प्रवेशाची प्रक्रिया तरी जलद गतीने राबविण्याची गरज आहे.

- सचिन कोकणे, विद्यार्थी