शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता ...

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने अकरावी प्रवेश कसे होणार, अशी चिंता सर्वांना लागली आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी कसरतीचे ठरणार आहे. मनासारख्या व नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी प्रवेशपात्रता निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजित केलेली सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांवरच गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यानुसारच अकरावीचे प्रवेश राबविले जाऊ शकतात. परंतु, अकरावीच्या ऑनलाइन अर्जाचा भाग-१ भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रियाही १६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक अकरावीच्या प्रवेशाविषयी चिंतित झाले असून आपल्याला जवळच्या व पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

---

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ९२२१०

अकरावीची प्रवेश क्षमता - २५,२७०

कोणत्या शाखेत किती जागा

कला -४९१०

वाणिज्य - ८६००

विज्ञान -१०१६०

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

----

आता प्रतीक्षा राज्य सरकारच्या निर्देशांची

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय रद्द झाल्याने एसएससी, सीबीएसई, आसीएसईसह विविध मंडळांच्या दहावीच्या निकालानुसार गतवर्षाप्रमाणेच प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. परंतु, अद्याप अकरावी प्रवेशांविषयी राज्य सरकारचे कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाही. शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

- के.आर. गीते, उपप्राचार्य केव्हीएन नाईक महाविद्यालय

विद्यार्थी चिंतेत

दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यांकन पद्धतीमुळे जाहीर करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने दहावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा परिस्थितीत सीईटीच्या माध्यमातून पसंतीचे महाविद्यालय मिळविण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू शकली असती. परंतु, आता चांगले टक्के असतानाही अपेक्षित महाविद्यालयातच प्रवेश मिळेल किंवा नाही, याची चिंता आहे.

- विलास जाधव, विद्यार्थी

--

सीईटी झाली असती तर नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली असती. परंतु, आता अंतर्गत मूल्यांकनात काही प्रमाणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने किमान प्रवेशाची प्रक्रिया तरी जलद गतीने राबविण्याची गरज आहे.

- सचिन कोकणे, विद्यार्थी