शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शासनाचा निधी कसा खर्च करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

नाशिक : राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबविता याव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण बजेटच्या ३ टक्के निधी महिला ...

नाशिक : राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबविता याव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण बजेटच्या ३ टक्के निधी महिला व बालकल्याण विभागाला देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील जिल्हा परिषदांच्या महिला व बालकल्याण विभागाला तीन टक्क्यानुसार नियतव्यय मंजूर करण्यात आले आहे. मात्र या निधी खर्चाविषयी शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांकडे विनाखर्च कोट्यवधीचा निधी पडून आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने ग्रामीण भागातही केलेला शिरकाव व संभाव्य लाटेत बालकांनाही कोरोना संसर्गाचा असलेला धोका लक्षात घेता दरवर्षी आदिवासी व दुर्गम भागातील कुपाेषित बालकांचे पावसाळ्यात होणारे शेकडोंचे मृत्यू रोखण्यासाठी शासनाने जानेवारी महिन्यातच याबाबतचा निर्णय घेतला होता. जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या एकूण निधीच्या ३ टक्के निधी महिला व बालविकास विभागाला म्हणजेच जिल्हा परिषदेकडे सुपुर्द करण्याचे ठरविण्यात आले व तसे शासन आदेश २९ जानेवारी २०२१ मध्ये काढण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीकडून यापूर्वी महिला व बालकल्याण विभागाला फक्त अंगणवाडी बांधकामासाठीच निधी प्राप्त होत होता. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील महिला व बालकल्याण विभागाला कमीत कमी १५ ते ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्या त्या नियोजन समिती प्रमुखांनी सदर निधीचे नियतव्य मंजूर करून तसे पत्र महिला व बालकल्याण विभागाला पाठविले आहे. मात्र सदर निधीतून कोणत्या योजना घ्यायच्या, काय उपाययोजना करायच्या याबाबत कोणतेही मार्गदर्शन जिल्हा परिषदांना करण्यात आलेले नाही. या संदर्भात ग्रामविकास विभागाच्या २४ जानेवारी २०१४ नुसार कार्यवाही करावी की शासनाच्या जानेवारी २०२१ नुसार निर्णय घ्यावा, अशा संभ्रमात जिल्हा परिषदा सापडल्या आहेत.

चौकट

दोन महिन्यांपासून निधी पडून

दोन महिन्यांपासून कोट्यवधीचा निधी मंजूर होऊनही त्याच्या खर्चाचे नियोजन करता येत नसून, गेल्या वर्षापासून कोरोनाच्या दृष्टचक्रात शासनाच्या अनेक योजना व विकासकामे अडकली आहेत. यंदाही मार्चपासून तीन महिने लॉकडाऊनमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने निधी खर्च करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, असे जिल्हा परिषदांचे म्हणणे आहे.