शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

युती झाल्यास मनसेला किती जागा?

By admin | Updated: January 31, 2017 00:29 IST

चर्चेला उधाण : सेनेकडून बोळवण होण्याची मनसैनिकांना भीती

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यदाकदाचित सेना-मनसे यांच्यात युती झाल्यास मनसेच्या पारड्यात किती जागा पडतील, याबाबत गणिते मांडली जाऊ लागली आहेत. मात्र, मनसेने विनाअट युती करण्याचा पवित्रा घेतल्याने सेनेकडून नाशिकमध्ये ४० ते ४५ जागांवर बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.  शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय स्तरावर उलथापालथ होण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेचा जीव मुंबईत तर मनसेचा जीव नाशिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे, सेना-मनसेत युती झाल्यास प्रामुख्याने, मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी जागावाटपाबाबत पेच उद्भवणार आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-रिपाइं मिळून २२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच जागांवर सेना-मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागून आतापर्यंत पक्षाच्या २८ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील १७ नगरसेवकांनी तर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली असून, मनसेनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडे ८०० हून अधिक तर मनसेकडे ४७३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.  आता यदाकदाचित युतीची टाळी वाजलीच तर सेना-मनसे यांच्यात जागावाटप कशाप्रकारे होईल, या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसेने विनाअट युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेकडून सुमारे ८० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या पारड्यात ४० ते ४५ जागा टाकून बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांना आहे. मनसैनिकांमध्ये युती व्हावी याबाबत तीव्र इच्छा असली तरी शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत. (प्रतिनिधी)