शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

युती झाल्यास मनसेला किती जागा?

By admin | Updated: January 31, 2017 00:29 IST

चर्चेला उधाण : सेनेकडून बोळवण होण्याची मनसैनिकांना भीती

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दूत पाठवत टाळीसाठी हात पुढे केल्यानंतर सेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यदाकदाचित सेना-मनसे यांच्यात युती झाल्यास मनसेच्या पारड्यात किती जागा पडतील, याबाबत गणिते मांडली जाऊ लागली आहेत. मात्र, मनसेने विनाअट युती करण्याचा पवित्रा घेतल्याने सेनेकडून नाशिकमध्ये ४० ते ४५ जागांवर बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.  शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय स्तरावर उलथापालथ होण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेचा जीव मुंबईत तर मनसेचा जीव नाशिकमध्ये अडकला आहे. त्यामुळे, सेना-मनसेत युती झाल्यास प्रामुख्याने, मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी जागावाटपाबाबत पेच उद्भवणार आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेना-रिपाइं मिळून २२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बऱ्याच जागांवर सेना-मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मनसेला मोठ्या प्रमाणावर गळती लागून आतापर्यंत पक्षाच्या २८ नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील १७ नगरसेवकांनी तर शिवसेनेत प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत शिवसेनेने १२२ जागांवर उमेदवार देण्याची पूर्ण तयारी केली असून, मनसेनेही स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेकडे ८०० हून अधिक तर मनसेकडे ४७३ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.  आता यदाकदाचित युतीची टाळी वाजलीच तर सेना-मनसे यांच्यात जागावाटप कशाप्रकारे होईल, या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसेने विनाअट युतीचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेकडून सुमारे ८० जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या पारड्यात ४० ते ४५ जागा टाकून बोळवण केली जाण्याची भीती मनसैनिकांना आहे. मनसैनिकांमध्ये युती व्हावी याबाबत तीव्र इच्छा असली तरी शिवसैनिकांमध्ये मतभेद आहेत. (प्रतिनिधी)