शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी कसे देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:32 IST

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी सायखेडा : गोदाकाठ भागात सायंकाळी सहा वाजेपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होते. सायंकाळी घराबाहेर शेकोट्या पेटविल्या जातात. खेड्यात आठ वाजता घरांची दारे बंद होतात.

सायखेडा : गोदाकाठ भागात सायंकाळी सहा वाजेपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होते. सायंकाळी घराबाहेर शेकोट्या पेटविल्या जातात. खेड्यात आठ वाजता घरांची दारे बंद होतात. सकाळी दहा वाजेपर्यंत हवेत गारवा असतो, अकरा वाजता रस्त्यावर रहदारी सुरु होते. अशा कडाक्याच्या थंडीत शेतात जाऊन रात्रभर पिकांना पाणी कसे देणार? आठ अंश तापमानात एक तास घराबाहेर पडणे शक्य नाही अशा वेळी रात्रभर पाटाच्या पाण्यात उभे राहून पाणी कस द्यायच असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात सायखेडा शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. भारनियमन वेळेत बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेनिफाड तालुक्यात कडाक्याची थंडी आहे. तालुक्यातील सर्वाधिक थंडी गोदाकाठ परिसरात असते. पाण्याचा प्रदेश, काळी कसदार जमीन, ऊस आणि नगदी पिके यामुळे सर्व शिवार ओलसर असल्याने पाण्याचे दव पसरून हवेत गारवा निर्माण होत असतो. त्यामुळे मोठी थंडी या भागात आहे. सुगीचे दिवस आहे. शेतात नगदी पिकांची लागवड केली आहे. पिकांना सातत्याने पाणी द्यावे लागते, या अगोदरची खरीप हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे खराब झाली होती. आता केवळ रब्बी हंगामातील पिकांवर शेतकर्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे अशा परिस्थितीत पिकांना पाणी गरजेचे आहे मात्र वीज वितरण कंपनीने भारनियमन वेळेत बदल केला आहे. रात्री बारा वाजता वीज पुरवठा सुरु केला जातो , प्रचंड थंडी, बिबट्याचा धुमाकूळ अशा परिस्थितीत रात्री शेतात जाऊन रात्रभर पिकांना पाणी देणे कठिण आहे.थंडीच्या दिवसात किमान दिवसा वीजपुरवठा सुरु ठेवावा असे निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा दिवसा सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे निवेदनात सोनगाव, सायखेडा, रामनगर, पिंपळगाव (निपाणी )येथील शेतकर्यांच्या सह्या आहे निवेदन देण्यासाठी अनिकेत कुटे , सोनगावचे सरपंच अंकुश गायकवाड, बाळु सुकेणकर यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक