शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

कसा देणार संगणकीय सातबारा उतारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST

गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.

नाशिक : गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले संगणकीय सातबारा उताºयाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून, राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनापासून आॅनलाइन प्रणालीने १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर संगणकीय सातबारा उतारा खातेदारांना देण्याचे जाहीर केलेले असले तरी, राज्यातील सुमारे ३६ हजार गावांतील सातबारा उताºयातील चुका अद्याप दुरुस्त करणे बाकी असल्याचे अलीकडे केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाल्याने शासनाच्या घोषणेने यंत्रणा हवालदिल झाली आहे.दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी संगणकीय सातबारा उताºयाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता त्यात ही बाब उघड झाली. शासनाने यापूर्वी १ मे महाराष्टÑ दिनापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले होते, परंतु सॉफ्टवेअर व सर्व्हरच्या त्रासामुळे तलाठी, मंडळ अधिकाºयांना मुदतीत काम पूर्ण करणे शक्य झाले नाही. म्हणून शासनाने १५ आॅगस्टचा मुहूर्त मुकर्रर केला.  महसूल सचिवांनी घेतलेल्या आढाव्यातदेखील वारंवार डाउन होणाºया सर्व्हरचा प्रश्न राज्यातील विभागाीय आयुक्तांनी उपस्थित करून यातील अडचणी सोडविण्याची मागणी केली. या अडचणींची महसूल सचिवांनीदेखील त्याच्याशी सहमती दर्शविली, मात्र आता शासनाने घोषणाच केलेली असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्णात किमान दोनशे गावांचे सातबारे तरी संगणकीय बिनचूक असावेत, अशा सूचना केल्या आहेत.प्रातिनिधिक वाटप?स्वातंत्र्य दिनापासून संगणकीय सातबारा उताºयांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप अनेक गावांमधील काम बाकी आहे. यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण समारोहानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करून  मुहूर्त साधला जाणार असल्याचे समजले आहे.राज्यात ४३ हजार ९४३ गावे असून, यंत्रणेने तयार केलेले संगणकीय सातबारांचे गावोगावी चावडी वाचन करण्यात येऊन हस्तलिखित सातबारा व संगणकीय सातबारा यांच्यातील चुका शोधण्यात आल्या. या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ‘रि-एडिट’ मॉड्यूल सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये काम करताना शासनाचे सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असून, स्पीड मिळत नसल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.गेल्या काही दिवसांत फक्त ७७४५ गावांचे सातबारा उतारे बिनचूक होऊ शकले म्हणजे आॅनलाइन प्रणालीने ते देण्यास हरकत नाही; मात्र शासनाने मागेल त्याला संगणकीय सातबारा उतारा देण्याचे जाहीर केले असून, ३६ हजार गावांमध्ये बिनचूक उताºयाचे काम झालेलेच नसल्याने यंत्रणा हवालदिल झाली आहे.